पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50 हजाराची मदत जाहीर करा

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50 हजाराची मदत जाहीर करा

माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
जननायक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बाबासाहेब कोरे
तर लातूर जिल्हाध्यक्षपदी सुर्यकांतराव शेळके यांची निवड
लातूर (प्रतिनिधी) : आठवडाभर झालेल्या पावसामुळे नदीकाठच्या गावातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50 हजाराची मदत जाहीर करा अन्यथा शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी आंदोलन उभारावे लागेल. असा इशारा जननायक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिला. यावेळी ते जननायक संघटनेच्या मजगे नगर येथील कैलास निवासस्थानी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत बोलत होते.

यावेळी जननायक संघटनेची राज्यस्तरीय कार्यकारीणीही जाहीर करण्यात आली.जननायक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बाबासाहेब कोरे तर लातूर जिल्हाध्यक्षपदी सुर्यकांतराव शेळके यांची निवड करण्यात आली. त्यांची ही निवड जननायक संघटनेेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैठकीत एकमताने करण्यात आली.

यावेळी या बैठकीमध्ये लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी बाबासाहेब देशमुख तर लातूर तालुका अध्यक्षपदी सारसा येथील बब्रुवान पवार यांची निवड करण्यात आली. लातूर शहर विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक जमिलभाई मिस्त्री यांची निवड करण्यात आली. तसेच लातूर शहराध्यपदी राधेशाम पारीख यांची निवड करण्यात आली. तसेच रेणापूर तालुकाध्यक्षपदी प्रतापराव शिंदे यांची तर कार्याध्यक्ष पदी लक्ष्मणराव यादव यांची निवड करण्यात आली.

यावेळी या राज्यस्तरीय बैठकीला प्रा.डॉ.सतीश यादव, आप्पासाहेब पाटील, भूजंगराव पाटील, मंजूरखाँ पठाण, राजपाल पाटील, शिरीष गांढले, राजेभाऊ मुळे, वैजनाथ जाधव, महादेव गायकवाड, ज्ञानेश्‍वर मोरे, जाजू शेठ, सुभाष सोनवणे, तुकाराम पवार, उध्दव जाधव, श्रीकांत झाडके, ललीत पाटील, बिभीषण शिंदे यांच्यासह जननायक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या हक्‍कासाठी कायदेशीर लढाई लढू

यावेळी या बैठकीमध्ये बोलताना जननायक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर बोलताना म्हणाले की, गावोगावी नदी खोलीकरणाच्या कामासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, जिल्हाप्रशासनाने गुंठेवारी पध्दत रद्द करून परंपरागत रजिस्ट्रीची पध्दत सुरू करावी, महाविकास आघाडी सरकारने जी कर्जमाफी केली. यामध्ये ज्या शेतकर्‍यांनी वेळेवर कर्जाचे हप्‍ते भरले आहेत अशा शेतकर्‍यांना 50 हजार रूपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे जाहीर केले होते त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी. विम्याच्या संदर्भातील नवीन निकष लागू केलेले आहेत ते तात्काळ रद्द करण्यात यावेत. याबरोबरच राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी एफ.आर.पी. प्रमाणे ऊसाला भाव द्यावा. अन्यथा शेतकर्‍यांच्या हक्‍कासाठी कायदेशीर लढाई लढण्यात येईल. असा विश्‍वासही त्यांनी उपस्थित पदाधिकार्‍यांना दिला.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!