निलंगा शिक्षक पतसंस्थेची पाच वर्षातील दमदार कामगिरी

निलंगा शिक्षक पतसंस्थेची पाच वर्षातील दमदार कामगिरी

सभासदांना 7% लांभाष व नववर्षापासुन व्याजदर 1% कमी
चेअरमन अरुण सोळुंके

निलंगा (प्रतिनिधी) : रोजी झालेल्या निलंगा ता जि प शिक्षक पतसंस्था निलंगा च्या 44 व्या आमसभेच्या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून शिवाजीराव साखरे (वाघ) शिक्षक नेते महाराष्ट्र राज्य, उद्घाटक म्हणून कालिदासरावजी माने साहेब शिक्षक नेते प्रहार संघटना, प्रमुख पाहुणे म्हणून सौ राधा ताई बिरादार पंचायत समिती सभापती निलंगा यांची उपस्थिती होती. शिक्षक पत संस्थेचे चेअरमन अरुण सोळुंके सर यांनी आमसभेचे प्रास्ताविक केले. या प्रास्ताविकात त्यांनी संबंधित वर्षातील व पाच वर्षातील दिलेल्या वचनाच्या वचनपूर्तीचा आलेख त्यांनी मांडला. आपण केलेली कामे कोणती. शिल्लक राहिलेली कामे. व ती का झाले नाहीत यांचे सविस्तर विवेचन केले. तसेच झालेली विकास कामे व न झालेल्या कामे स्वतः कबूल करून ती कशी पूर्ण करता येतील याबाबत चर्चा करून संबंधित पाच वर्षात तोट्यातून नफ्यात कशी आणली व त्यातून स्वयंपूर्ण कशी करता येईल हेही सांगितले. यासाठी शंभर टक्के वसुली व आमचे निस्वार्थ काम व सर्व सभासदांची आमच्या पाठीमागे खंबीर साथ या जर गोष्टी झाल्या निश्चितच पुढील काळात सोसायटी स्वयंपूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी कालिदास राव माने सर,शिवाजीराव साखरे वाघ सर, मा सौ राधा ताई बिरादार यांनी अतिशय सुंदर व मार्मिक अशा प्रकारे मार्गदर्शन केले. दुपार सत्रात माननीय केशव भैया गंभीरे यांनी मागील वर्षी घेतलेले ठराव व पतसंस्थेचा लेखाजोखा वाचन करून दाखवले व सभासदांनी विचारलेल्या प्रश्नाला गंभीरे सर, अरुण सोळुंके, संजय कदम व समस्त संचालक मंडळाने अतिशय समर्पक उत्तरे देऊन समाधान समाधान केले. विशेष म्हणजे संचालक मंडळाचे कार्यच इतके चांगले आहे आहे की, निर्थक प्रश्न सोडले तर सभागृहाला विचारांसाठी प्रश्नच नव्हते. एकंदरीत तोट्या मध्ये चालणारी पतसंस्थेचा चा कारभार घेऊन संबंधित संचालक मंडळाने या पाच वर्षात भत्ता न घेता निस्वार्थपणे पतसंस्थेसाठी अतिशय मोलाची कामगिरी करण्याचे कार्य केलेले आहे. यापूर्वीच्या शिक्षकांनी पै-पै मधून ही सोसायटी उभा केली या सोसायटीत ला अबाधित राखण्यासाठी संबंधित संचालक मंडळाने अरुण सोळुंके, केशव भैया गंभीरे, संजयजी कदम यांच्या नेतृत्वाखाली अप्रतिम कार्य केले आहे .

निलंगा तालुका जि. प.शिक्षक पतसंस्थेचे नेतृत्वाखाली पाच वर्षातील संचालक मंडळांची कामगिरी
1) पस्तीस लाख चाळीस हजार तोटा असलेली पतसंस्था नफ्यात आणून 3%, 6%व यावर्षी 7%लाभांश वाटप करण्यात आला.
2) कर्जमर्यादा पाच लाखावरून 12 लाख करण्यात आली.
3) कर्ज घेत असताना भागभांडवल कपात रक्कम 15% वरुन 10%करण्यात आले.
4) गेल्या पाच वर्षात 11 मयत शिक्षकांचे कर्ज निधी हमी व्याजातून 33,32,036 रू कर्ज माफ करण्यात आले.
5) पतसंस्था संगणकीय करून SMS सुविधा देण्यात आली आहे.
6) पतसंस्था स्वभांडवलावर येण्यासाठी मुदत ठेवी झाल्या.व आर. डी. ची योजना चालू केली आहे.
7) पतसंसथेत महिला भगिनी सभासदांसाठी मकरसंक्रांतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम घेतला.
8) प्रत्येक सभासद बांधवाला दरवर्षी कर्जखतावणी स्लिपा दिल्या
9) पाच वर्षात संचालक मंडळांनी भत्ता घेतला नाही.
10) पारदर्शक व काटकसरीने पतसंस्थेचा कारभार करण्यात आला..
11) वचननाम्यातील 17 पैकी 14 मुद्द्यांची पुर्तता करण्यात आली.
सभासद बांधवांनी पतसंस्थेत संचालक मंडळांच्या कारभाराचवर विश्वास ठेवून दीड कोटी रूपये ठेव ठेवली आहे
आमसभेस उपस्थित संचालक केशव गंभिरे, संजय कदम, लखणे धर्मप्रकाश, पाटील चंद्रकांत, गुंडुरे डी बी, धुमाळ डी एस, संजय अंबुलगेकर, सराटे पी जी, दिपाली माने, सुनिता रोळे, उपस्थित होते. सुञसंचलन दयानंद मठपती व आभार संजय कदम यांनी केले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!