जिल्हा बँकेत सर्वांना सोबत घेवून समन्वयाने कार्य केले – दिलीपराव देशमुख

जिल्हा बँकेत सर्वांना सोबत घेवून समन्वयाने कार्य केले - दिलीपराव देशमुख

उदगीर मतदार संघातून लक्ष्मीताई भोसले तर जळकोट मधून मारोती पांडे यांची उमेदवारी जाहीर

उदगीर (प्रतिनिधी) : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मागच्या 25 वर्षात शेतकरयांना मदत करण्याच्या दृष्टीने मोठी भूमिका बजावली असून त्यामूळेच जिल्ह्याच्या 500 विविध कार्यकारी सोसायटी ज्या 1 लाख रुपये कर्ज वाटप करत होत्या त्या आज एक कोटी पेक्षा अधिक कर्ज वाटप करून शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता देण्याचे काम जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुरू आहे हे करीत असताना कधीही वसुलीसाठी जप्ती न करता बँक पुनर्वस नातून बाहेर काढून आज राज्यात नव्हे तर देशात लातूर बँक पहिली ठरली आहे असे सांगून माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी येणाऱ्या निवडणुकीत बँक बु डवण्याचा अनुभव असणारे लोक येणार असल्याचे बोलले जात आहे त्यासाठी त्यांना रोखा आपण उभे केलेल्या कल्पवृक्षाला द्रिस्ट लागणार याची खबरदारी घ्यावी असे सांगून उदगीर व जळकोट मतदार संघातील दोन्ही उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले ते रविवारी उदगीर येथील भोसले कॉम्प्लेक्स येथे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक 2021 अनुषंगाने उदगीर व जळकोट तालुक्यातील सोसायटीचे चेअरमन मतदार यांच्याशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते याच वेळी त्यांनी उदगीर मधून लक्ष्मीताई भोसले तर जळकोट येथून मारोती पांडे यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनल ची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

संवाद मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी आमदार अँड त्रिंबक भिसे राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल्य उटगे , प्रदेश काँग्रेस सरचिटणीस राजेश्वर निटूरे, काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, बाजार समितीचे सभापती मुन्ना पाटील, उपसभापति रामराव बिरादार, जागृती शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, लक्ष्मीबाई भोसले, प्रीती भोसले, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटूरे, बँकेचे संचालक संभाजी सुळ, एन आर पाटील, सौ स्वयं प्रभा पाटील, संभाजी रेड्डी, दिलीप पाटील नागराळकर, सोपान ढगे, हरीराम कुलकर्णी उपसभापती मारलापल्ले, चांदपाशा इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वप्न बघा साकार करण्याची जबाबदारी आमची

यावेळी बोलताना दिलीपराव देशमुख म्हणाले की गेल्या 35 वर्षात जिल्हा बँकेने अनेक धाडसी निर्णय घेत शेतकरी सभासद ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक विकास करण्यासाठी मदत केली आहे यापुढे ग्रामीण भागातील लोकांनी स्वप्न तुम्ही बघा स्वप्नपूर्ती करायचे काम मी करतो तुम्ही शिक्षण घ्या डॉक्टर इंजिनीयर जिल्हाधिकारी व्हा आम्हाला सांगा काळजी करून तुम्हाला मदत करण्याची भूमिका बजावली आहे यापुढेही बजावू असा शब्द त्यांनी दिला.

राज्यात लातूर जिल्हा बँकेची अभिमान वाटावी अशी वाटचाल – राज्यमंत्री संजय बनसोडे

यावेळी बोलताना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल ठेवली असून त्याचा मला अभिमान वाटतो असे सांगुन आम्हाला घडविण्यात व ईथे जो मी उभा आहे त्यात सर्वात मोठे योगदान दिलीपराव देशमुख साहेब यांचे राहीले आहे हे मी विसरू शकत नाही मागच्या काळात माझ्याकडून काही नजरचुकीने चुका झाल्या असतील पण यापुढे चुकीचं कुठलेही माझ्या हातून काम होणारं नाही याची मी काळजी घेतो अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली

यावेळी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस राजेश्वर निटूरे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कल्याण पाटील, सोपान ढगे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष मंजूर पठाण, रामेश्वर बिरादार, जाधव, उदगीर, जळकोट तालुक्यातील सोसायटीचे चेअरमन मतदार मोठया संख्येने उपस्थित होते सूत्रसंचलन भांगे यांनी केले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!