श्यामार्य कन्या विद्यालयात गुणवत्ता विकास मार्गदर्शन बैठक संपन्न

श्यामार्य कन्या विद्यालयात गुणवत्ता विकास मार्गदर्शन बैठक संपन्न

उदगीर ( प्रतिनिधी ) : श्यामार्य  कन्या विद्यालयात शिक्षण विभाची  उदगीर शहरातील मराठी माध्यमाच्या माध्यमिक विभागातील सर्व मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी नितीनजी लोहकरे  होते.  केंद्रप्रमुख बालाजी धमनसुरे, केंद्रप्रमुख श्रीमती प्रतिभा मुळे आणि आयोजक शामार्य कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्ञाते तृप्ती उपस्थित होते. श्यामार्य कन्या विद्यालयाच्या वतीने सर्व मान्यवरांचे शाल ,श्रीफळ व ग्रंथ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमती देशमुख संगीता व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सोबत स्वागत गीत गायन करण्यात आले.

        कोव्हीड-19  मुळे मार्च   2020 पासून प्रत्यक्ष शाळा बंद करण्यात आल्या होत्या. पण या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ई-लर्निंग द्वारे अध्यापन करण्यात आले. श्यामार्य कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध उपक्रम व नवोपक्रम राबवले जातात. शाळा सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात शाळा आणि शिक्षक आणि काय करण्याची गरज आहे याबद्दल राज्याच्या टास्क फोर्सने आवाहन केले आहे . या अहवानाप्रमाणे  आणि  संस्थेच्या  सततच्या मार्गदर्शनानुसारआमच्या शाळेत सर्व नियमावलीची अंमलबजावणी करण्यात येत आहेत. असे प्रास्ताविक मधून शामार्य कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्ञाते यांनी आपले  मत  व्यक्त केले.

           उदगीर शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जावे या हेतूने आपण पूर्वतयारी करणे   आवश्यक आहे. आपल्या देशात शिक्षणाबददल जितके चिंतन होण्याची गरज आहे. शिक्षकांच्या समोर विद्यार्थ्यांना शाळेशी जोडणे आणि गुणवत्ता राखणे यासाठीचे आव्हान कसे पेलणार हा प्रश्न आहे.त्यामुळे गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्व शाळांनी आपआपल्या स्तरावर एक   गुणवत्ता   विकास आराखडा तयार करावा, आणि त्याची अंमलबजावणी करावी.  असे अध्यक्षीय समारोपात  गटशिक्षणाधिकारी नितीनजी  लोहकरे यांनी आपले मत व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आनंद हुरदळे आणि आभार राहुल गुरमे यांनी व्यक्त केले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!