पळशी ग्रामपंचायतीवर आदर्श ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय

पळशी ग्रामपंचायतीवर आदर्श ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय

विजयाची परंपरा कायम : सत्तेचे सुत्रे पुन्हा जाधवांच्याच हाती राहण्याची शक्यता

लातूर (प्रतिनिधी) : रेणापूर तालुक्यातील पळशी येथील ग्रामपंचातीच्या निवडणुकीत आदर्श ग्रामविकास पॅनल व परिवर्तन ग्रामविकास आघाडी यांच्यामध्ये झालेल्या दुरंगी चुरशीच्या लढतीत 7 जागेपैकी 6 जागेवर आदर्श ग्रामविकास पॅनलने दणदणीत विजय मिळविला आहे. तर एक जागा विरोधकांच्या हाती गेलेली आहे. तरीही पळशी गावचे सर्वेसर्वा देविदासरावभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखालील आदर्श ग्रामविकास पॅनलच्या विजयामुळे गावच्या विकासाला चौफेर गती मिळणार आहे.

आदर्श ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून उद्योजक उध्दवराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली वार्ड 1 मधून वर्षा गुणवंत भंडारे, मिरा परमेश्‍वर जाधव यांनी परिवर्तन ग्रामविकास आघाडीच्या उमेदवारांना पराभूत करून विजय मिळविला आहे. वार्ड 2 मधून दशरथ गोविंदराव जाधव, अंजलीताई चंद्रकांतराव जाधव यांनी विजय मिळविला आहे. तर वार्ड 3 मधून गंगाधर रानबा शिंदे, वंदना नानासाहेब पुरी यांनी प्रंचड मताधिक्य घेवून विजय मिळविलेला आहे. विकासाचा जाहीरनामा नसतानाही केवळ उमेदवारांच्या विश्‍वासावर मतदान देवून मतदारांनी विजयाची पताका आदर्श ग्रामविकास पॅनलच्या गळ्यात घातलेली आहे. त्यामुळे एकतर्फी विजय मिळविलेल्या आदर्श ग्रामविकास पॅनलच्या विजयी उमेदवारांचा देविदासराव जाधव यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. या आदर्श ग्रामविकास पॅनलच्या विजयासाठी दगडूसाहेब जाधव, चंद्रकांत जाधव, बब्रुवान शिंदे, भास्कर शिंदे, श्रीहरी जाधव, काकासाहेब जाधव, रमेश गायकवाड, भारत जाधव, राजाभाऊ जाधव, नामदेव कदम, दिगंबर जाधव, श्रीमंत जाधव, धनेश्‍वर शिंदे, सिध्देश्‍वर जाधव, बाळासाहेब जाधव, गुणवंत कदम, मुरली कदम, सटवा कदम, श्रीनिवास जाधव, दिपक जाधव, रामराव ढमाले, हणमंतराव जाधव, पांडूरंग जाधव, काकासाहेब शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!