कु. पूजा चव्हाण नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सर्वप्रथम

कु. पूजा चव्हाण नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सर्वप्रथम

अहमदपूर (गोविंद काळे) : नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाने घेतलेल्या उन्हाळी २०२१ बी.ए. पदवी परीक्षेत येथील महात्मा फुले महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. पूजा गोपीचंद चव्हाण ही९०.४०टक्के घेऊन गुणानुक्रमे सर्वप्रथम आली आहे. यापूर्वीही २०१७ मध्ये महात्मा फुले महाविद्यालयाचा गुणवंत विद्यार्थी तानाजी कांबळे हा विद्यापीठात सर्वप्रथम आला होता. त्याने भूगोल विषयात विद्यापीठाचे गोल्ड मेडलही प्राप्त केले होते. तर २०१८ मध्ये दीपाली परतवाघ ही विद्यार्थिनी विद्यापीठातून संस्कृत विषयात सर्व प्रथम आली व ती गोल्ड मेडलची मानकरी ठरली. तर २०१९ मध्ये कैलास ससाणे या विद्यार्थ्याने विद्यापीठातून द्वितीय क्रमांक पटकाविला ; तसेच त्याने इंग्रजी आणि भूगोल विषयात विद्यापीठाचे गोल्ड मेडल पटकाविले. महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयात गुणवत्ता विकासासाठी विविध प्रकल्प राबविले जातात. तसेच त्यांना वेळोवेळी प्राध्यापकांचे अभ्यासपूर्ण असे मार्गदर्शन लाभते. त्यामुळे उच्च शिक्षणात गुणवत्तेचा नवा ‘ महात्मा फुले पॅटर्न ‘ निर्माण झाला आहे.

दरवर्षी महात्मा फुले महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये झळकत असतात. या वर्षी पुन्हा एकदा पूजा चव्हाण या विद्यार्थिनीने विद्यापीठात सर्वप्रथम येऊन महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. यावर्षी महाविद्यालयाचा एकूण निकाल शंभर टक्के लागला असून, सर्वच्या सर्व ४१ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. यात चव्हाण पूजा गोपीचंद, शेख मिस्बा अलिमुद्दिन, मलकापुरे रेणुका पुंडलिक, नरवटे गणेश मोहन, गायकवाड तेजस्विनी अरुण, गवळे निकिता गणेश, मकापल्ले राणी माधवराव, सोनकांबळे प्रियंका अशोक, हौसे योगेश हनुमंतराव, भदाडे मंजुषा भास्कर, कांबळे पूजा भाऊसाहेब, भालेराव निखिल भैय्यासाहेब, कांबळे निखिल भानुदास, टोकलवाड शुभांगी नामदेव, सुरनर जया एकनाथ, गायकवाड रमाताई श्रीराम, तेलंगे संतोष संभाजी, देमगुंडे कुसुम खंडेराव, मेकाले हनुमंत बापूराव, रोडे नीलेश उत्तम, वाघमारे भाग्यश्री संतराम, राठोड कृष्णा मेहरबान, देशमुख पूजा केशवराव, भुतके वैष्णवी दगडू, सोळंके संभाजी वसंत, सुरनर प्रतिभा गिरीधर, नायने गोविंद नागनाथ, कराड प्रवीण केशव, लिंबले कविता राजाराम, लामतुरे वैभव मधुकर, सकनुरे प्रियंका अर्जुन, वाघमारे अमोल गौतम, बनसोडे अस्मिता लक्ष्मण, सावंत निकिता निवृत्ती, शिंदे अजित देवीदास, पिलवटे योगेश्वरी किशोर, शिंदे कुणाल बालाजी, सुरनर पवन शिवराज, कांबळे सुजाता दौलत, चारोळे कोमल दगडोबा आणि कराड पवनकुमार राजेंद्र या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या पूजा गोपीचंद चव्हाण या विशेष गुणवंत विद्यार्थिनीचे आणि सर्व विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी आणि सर्व प्राध्यापक व कर्मचा-यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!