जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी, लघुउद्योजकांना न्याय देणार – लक्ष्मी ताई भोसले

जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी, लघुउद्योजकांना न्याय देणार - लक्ष्मी ताई भोसले

 उदगीर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून लोकनेते स्व. चंद्रशेखरजी भोसले साहेब यांनी लातूर जिल्ह्यातील गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, लघुउद्योजक, सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून मोठे काम सुरू केले होते. जनतेची सेवा हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून चंद्रशेखर भोसले साहेब काम करत होते. त्यांचा वसा कायम ठेवून आपण देखील सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब, पालकमंत्री अमित भैया देशमुख, राज्यमंत्री संजयजी बनसोडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील आणि सर्व जेष्ठ नेते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला लोकाभिमुख करण्यासाठी आपण प्रयत्न करू. असे आश्वासन लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित संचालिका श्रीमती लक्ष्मीताई भोसले यांनी दिले.

 पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, लोकनेते चंद्रशेखर भोसले यांच्या अकाली जाण्याने कार्यकर्ते सैरभैर झाले होते. त्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी ही आपण कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे, असे त्यांनी सांगितले. सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मध्यवर्ती बँक ही जणू कल्पवृक्ष बनली आहे. त्यामुळे या बँकेच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, उद्योजक यांना अर्थसाह्य देऊन सहकार्य करून प्रगतीच्या गतीने घेऊन जाणार आहे असे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

 उदगीर परिसरातील बहुसंख्य विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन, संचालक आणि लोकनेते चंद्रशेखर भोसले यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वतीने लक्ष्मीताई भोसले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.सत्कार करण्यात आला याप्रसंगी बोलताना लक्ष्मीताई भोसले म्हणाले की, तुम्ही सर्व माझे पाठबळ आहात. नेत्यांनी आणि मतदारांनी दाखवलेला माझ्यावरचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. कार्यकर्त्यांनी खचून न जाता हिमतीने पुढे येऊन कार्य करावे. त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यात मलाही आनंद मिळेल, असे स्पष्ट केले.

 याप्रसंगी लोकनेते चंद्रशेखर भोसले प्रतिष्ठानच्या अध्यक्षा प्रितीताई चंद्रशेखर भोसले, रामेश्वर बिरादार जकनाळकर, रमेश पाटील तपशाळकर, कुमार पाटील, धनाजी मुळे यांच्यासह चेअरमन आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!