आत्मविश्‍वासाने प्रेरीत होऊन काम करणारा सेवानिवृत्तच होत नाही – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

आत्मविश्‍वासाने प्रेरीत होऊन काम करणारा सेवानिवृत्तच होत नाही - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

लातूर (प्रतिनिधी) : गावचा ग्रामसेवक ते विस्तार अधिकारी पदापर्यंतचा प्रवास करणार्‍या भागवतराव भिसे यांनी ग्रामस्थांची मर्जी सांभाळून आतापर्यंत चांगले काम केलेले आहे.या कामाच्या माध्यमातून अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मोठ्या प्रमाणात संघटन निर्माण झालेले आहे. त्यामुळे यापुढील कालावधीतही ते असेच सक्रियपणे काम करीत राहतील, काम करणारा माणूस सेवानिवृत्तीनंतरही आत्मविश्‍वासाने प्रेरीत होऊन काम करतो त्यामुळे त्यांची सेवानिवृत्तीच होत नाही तो कायम सेवेतच राहतो. असे प्रतिपादन भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी व्यक्‍त केले.

यावेळी ते विस्तार अधिकारी (कृषी)भागवतराव भिसे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त रूक्मिनी मंगल कार्यालय परिसरात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला अखील भारतीय वारकरी महामंडळ,पुणे विभागाचे अध्यक्ष ह.भ.प.नामदेव महाराज चव्हाण आळंदी (दे), बीड जिल्हा मध्यवर्ती सह.बँकेचे संचालक दत्तात्रय पाटील, मारोती महाराज साखर कारखाना बेलकूंडचे व्हा.चेअरमन शाम भोसले, लातूर जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंद चिलकुरे, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, लातूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, लातूर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एस.आर.चोले, गटविकास अधिकारी नंदकिशोर शेरखाने, रा.ग्रा.स्व.अभियान पुणेचे राज्याचे प्रभारी उपसंचालक शाम पटवारी, लातूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शाम गोडभरले, शिरूर अनंतपाळ पं.स.चे गटविकास अधिकारी बी.टी.चव्हाण, भागवतराव भिसे, लक्ष्मीबाई भागवतराव भिसे, ग्रामसेवक संघटना लातूरचे अध्यक्ष विष्णू भिसे, दत्तात्रय भिसे, तुकाराम भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.

आत्मविश्‍वासाने प्रेरीत होऊन काम करणारा सेवानिवृत्तच होत नाही - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी मॅडम असताना लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासकामासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळवून दिला. त्यावेळी लातूर जिल्हा परिषदेचे सी.ई.ओ. म्हणून जगदाळे हे अधिकारी होते. त्यांनीही खूप सहकार्य केले. त्यामुळे लातूर जिल्हा परिषद ही देशात पहिली आली असून या जिल्हा परिषदेला 50 लाखाचे पारितोषिक मिळाले ही आपल्या दृष्टिने आनंदाची बाब आहे. जो माणूस आत्मविश्‍वासाने काम करतो. त्याची सेवानिवृत्ती होत नाही. राजकीय क्षेत्रामध्ये राष्ट्रवादीचे सर्सेसर्वा शदरचंद्रजी पवार यांची वयाची 85 वर्ष पूर्ण झाली आहे. तसेच लालकृष्ण अडवाणी यांची वयाची 90 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तरीही ते त्याच आत्मविश्‍वासाने राजकारणात सक्रियपणे काम करतात. त्यामुळे आपणही यापुढील कालावधीत आत्मविश्‍वासाने कामे करावीत आणि पुढील सामाजिक कार्यात सक्रिय रहावे, असे आवाहनही भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विस्तार अधिकारी भागतवराव भिसे व लक्ष्मीबाई भागवतराव भिसे यांचा सहकुटुंब सत्कार भाजपा नेते तथा किसान मोर्चाचे गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याहस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनंत सुर्यवंशी यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार लोमटे यांनी मानले. या कार्यक्रमाला धनंजय भिसे, भागवत भिसे, किसनराव लोमटे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!