द्वारकादास श्यामकुमार ग्रुपकडून अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयास वृक्षरोपे भेट

द्वारकादास श्यामकुमार ग्रुपकडून अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयास वृक्षरोपे भेट

ग्रुपकडून दरवर्षी फुले महाविद्यालयातील ९ विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीतून दत्तक घेऊन तुकाराम पाटील हे पालकत्त्व स्वीकारतात

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील द्वारकादास श्याम कुमार ग्रुप तर्फे सामाजिक बांधिलकी जोपासत पर्यावरणाच्या संवर्धनासाठी अहमदपूर शहरात मोलाची कामगिरी बजावत असलेल्या महात्मा फुले महाविद्यालयास विविध प्रकारची दहा वृक्षरोपे व्यवस्थापक शिवाजी सूर्यवंशी यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांना भेट दिली.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, कापड उद्योगात अग्रगण्य असणारे द्वारकादास श्यामकुमार हे कापड दुकान फक्त व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवून उद्योग क्षेत्रांमध्ये नावारूपास आले नाही तर सामाजिक बांधिलकी जोपासत या उद्योग समूहाने अल्पावधीत व्यावसायिक क्षेत्रांमध्ये भरारी घेतली आहे. या उद्योग समूहाचे प्रमुख तुकाराम पाटील हे विविध सामाजिक उपक्रमात सहभागी असतात. तुकाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर येथील द्वारकादास श्यामकुमारचे व्यवस्थापक शिवाजी सूर्यवंशी यांनी विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रांमध्ये हे मोलाचे कार्य केले आहे .
याचाच एक भाग म्हणजे शिवाजी सूर्यवंशी यांनी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांना विविध प्रकारची दहा वृक्षरोपे भेट दिली . यावेळी उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी , डॉ. सतीश ससाणे, डॉ. नागराज मुळे, डॉ. अनिल मुंढे , डॉ. मारोती कसाब , डॉ. संतोष पाटील , राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

विशेष म्हणजे द्वारकादास श्यामकुमार हा उद्योग समूह प्रत्येक वर्षी महात्मा फुले महाविद्यालयाचे ९ विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांच्या उच्च शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेतात. या विद्यार्थ्यांची निवड विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती, शिक्षण घेण्याची इच्छा पाहून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे करतात. शिक्षणापासून वंचित असणाऱ्या व उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यवस्थापक शिवाजी सूर्यवंशी यांच्या सहकार्याने व द्वारकादास श्यामकुमारचे मालक तुकाराम पाटील यांच्या दातृत्त्व वृत्तीमुळे यांच्या सहकार्यातून व प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे किसान शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीर च्या ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय ‘ या बोधवाक्याने प्रेरित होऊन अहमदपूर सारख्या ग्रामीण भागात शेकडो वर्षांपासून शिक्षणापासून दूर असणाऱ्या समुहा पर्यंत उच्च शिक्षण पोहचवण्याचे कार्य करतात. द्वारकादास श्यामकुमारचे व्यवस्थापक शिवाजी सूर्यवंशी हे करीत असलेल्या सामाजिक कार्याचे व पर्यावरण संवर्धनाचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!