महिलांनी कौटुंबिक अन्याय सहन न करता अभय केंद्रात तक्रार करा – सौ. प्रीती शेलोकार
अभय केंद्र व जयश्रीताई राठोड मित्रपरिवाराच्या संयुक्त विद्यमाने घेतले शिबीर
महागाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील तीवरंग कौटुंबिक हिंसाचार कायदा व संरक्षण मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न झाले. सौ जयश्रीताई राठोड मित्रपरिवार व अभय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कायदेविषयक शिबीर कार्यक्रमाला सुरुवात क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
या मार्गदर्शन शिबिराच्या अध्यक्ष स्थानी सरपंच सौ जयश्री राठोड होत्या तर प्रमुख मार्गदर्शिका म्हणून तालुका महिला संरक्षण अधिकारी सौ प्रीती शेलोकार यांनी मार्गदर्शन केले असून त्यांनी महिलावरील कौटुंबिक अत्याचारामध्ये सध्या वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधात्मक कायदा पीडित महिलांना आधार ठरत असून आम्ही कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिला मुलीसाठी मदत करत असून या कायद्याच्या आधारे महिलाना अभय केंद्रा मार्फ़त मदत करत असतो. तर महिलांवर घरगुती कौटुंबिक अत्याचार होत असेल तर त्या महिलांनी अन्याय सहन न करता समोर येऊन आमच्याकडे म्हणजे अभय केंद्रात तक्रार द्याव्यात त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करू असे ही ते मार्गदर्शनाच्यावेळी म्हणाल्या, सोबतच आज घडीला महिलां,मुलीवर घरगुती हिंसाचार वाढत असुन या हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली असुन कौटुंबिक हिंसाचारापासुन महिलांचे संरक्षण कायदा २००५च्या अंमलबजावणी करिता तालुकास्तरावर अभय केंद्राची निर्मिती करून या याठिकाणी शासनाने संरक्षण अधिकारी कार्यरत केले आहेत या संरक्षण अधिकारी व केंद्राद्वारे घरगुती हिंसाचार रोखणे, घरगुती हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या महिलांना त्यांची इच्छा असेल तर प्रकरण न्यायालयात दाखल करून विधी सेवा प्राधिकरणामार्फत न्यायालयीन लढाई लढून न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो तसेच कौटुंबिक हिंसाचारात बळी पडलेल्या महिलांना आरोग्य सुविधा,गरज पडल्यास पोलीस प्रशासनाची मदत मिळवुन देणे,राहण्याची सुविधा नसल्यास त्यांची आधार गृहात रवानगी करणे असे कार्य या अभय केंद्रामार्फत केले जाते असे ही यावेळी शेलोकार मार्गदर्शनात बोलताना म्हणाल्या.
सोबतच कौटुंबिक छळ म्हणजे छळ करणारी व्यक्ती ही एकाच घरात राहत असेल त्यांच्यात रक्ताचे, विवाहाचे, दत्तक किंवा एकत्र कुटुंबातून निर्माण झालेले नातेवाईक असतील व त्यात शारिरीक, शाब्दिक, लैंगिक, मानसिक, आर्थिक, स्त्रीधन, हुंडा किंवा मालमत्ता तसेच अपमानीत करणे, शिवीगाळ करणे, विशेषतः अपत्य नसल्यामुळे तिला वारंवार हिणवणे किंवा धमकावणे म्हणजेच हिंसाचार आहे याची सुद्धा मार्गदर्शनात माहिती दिली.या मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार राम जाधव, जिल्हा परिषद मुख्याध्यापिका सौ वैशाली डोंगरे,भोसा ग्रामपंचायत सरपंच सौ.जयश्री चव्हाण, तीवरंग ग्रामपंचायत सदस्या सौ जरीना चव्हाण,सौ आशा चव्हाण,सौ सोनू आडे उपस्थित होत्या तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेखा राठोड, पूजा राठोड,वर्षा गायकवाड,रुपाली वाघमारे, अमोल कौडकर,रवी जाधव,खुशाल पवार,रैना पवार तसेच सौ जयश्रीताई राठोड मित्रपरिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सोबीन चव्हाण यांनी केले तर रेखा राठोड यांनी मानले.
