लातूर-बार्शी रस्‍त्‍याच्‍या कामाला प्रत्‍यक्ष सुरूवात; ना. गडकरी यांचे आ. कराड यांच्‍याकडून आभार

लातूर-बार्शी रस्‍त्‍याच्‍या कामाला प्रत्‍यक्ष सुरूवात; ना. गडकरी यांचे आ. कराड यांच्‍याकडून आभार

लातूर (प्रतिनिधी) : केंद्रीय वाहतूकमंत्री नितीनजी गडकरी यांनी दिल्‍ली भेटीत लातूर-बार्शी रस्‍त्‍याचे काम लवकरच टप्‍याटप्‍याने करण्‍यात येईल असे सांगीतले होते. त्‍यानुसार या रस्‍त्‍याचे पहिल्‍या टप्‍यातील लातूर विमानतळ चौक ते मुरूड अकोला दरम्‍यानचा कामाला प्रत्‍यक्ष सुरूवात झाल्‍याने दिलेला शब्‍द पाळल्‍याबद्दल त्‍यांचे भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी जाहीर आभार व्‍यक्‍त करून सदर रस्‍त्‍याचे उर्वरीत सर्व काम लवकरच पुर्ण होवून जनतेची गैरसोय दूर होईल असे बोलून दाखविले.

लातूर ते बार्शी या रस्‍त्‍यावरून मुंबई पुणे व अन्‍य ठिकाणी जाणाऱ्या वाहनाची सतत मोठी गर्दी असते. अरूंद रस्‍त्‍यामुळे या रस्‍त्‍यावर अनेकवेळा अपघात झाले, अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या रस्‍त्‍याबाबत राज्‍यशासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही गेली अनेक वर्षापासून या लातूर-बार्शी रस्‍त्‍याचे काम होत नव्‍हते. गेल्‍या ३ ऑगस्‍ट २०२१ रोजी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍यासह भाजपाचे किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, प्रदेश प्रवक्‍ते गणेशदादा हाके, जिपचे अध्‍यक्ष राहूल केंद्रे, भाजपाचे जिल्‍हा सरचिटणीस अशोक केंद्रे, ओबीसी सेलचे जिल्‍हाध्‍यक्ष बापुराव राठोड आदींच्‍या शिष्‍टमंडळाने केंद्रीय वाहतूकमंत्री नितीनजी गडकरी यांची दिल्‍ली येथे भेट घेवून लातूर-बार्शी या रस्‍त्‍यासह विविध रस्‍त्‍याची कामे व्‍हावीत अशी मागणी करून सविस्‍तर चर्चा केली.

यावेळी नितीनजी गडकरी यांनी लातूर ते बार्शी या रस्‍त्‍याचे काम लवकरच टप्‍याटप्‍याने पुर्ण करण्‍यात येईल असे शिष्‍टमंडळास बोलून दाखविले होते. त्‍यानुसार सदरील लातूर-बार्शी या रस्‍त्‍याचे पहील्‍या टप्‍यातील लातूर विमानतळ चौक ते मुरूड अकोला दरम्‍यानच्‍या कामाला दोन दिवसापुर्वीच सुरूवात झाली आहे. सदर कामाला प्रत्‍यक्ष सुरूवात झाल्‍याने दिलेला शब्‍द पाळल्‍याबद्दल केंद्रीय वाहतूकमंत्री नितीनजी गडकरी यांचे भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी जाहीर आभार व्‍यक्‍त केले आहे. विमानतळ ते महिला तंत्रनिकेतन आणि मुरूड अकोला ते करकट्टा या रस्‍त्‍याचेही काम तात्‍कळ सुरू करण्‍यात यावे अशी मागणी दिल्‍ली भेटीतच गडकरी यांना एका निवेदनाद्वारे केली होती. त्‍यानुसार याही टप्‍यातील कामास लवकरच सुरू होणार आहे. लातूर ते बार्शी हा संपुर्ण रस्‍ता लवकरच पुर्ण होवून जनतेची होणारी गैरसोय दूर होईल असे आ. रमेशअप्‍पा कराड यांनी सांगीतले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!