मराठीच्या वैभवशाली परंपरेचा मराठी भाषकांना सार्थ अभिमान – डॉ. विठ्ठल जंबाले यांचे प्रतिपादन

मराठीच्या वैभवशाली परंपरेचा मराठी भाषकांना सार्थ अभिमान - डॉ. विठ्ठल जंबाले यांचे प्रतिपादन

अहमदपूर (गोविंद काळे) : मध्ययुगीन काळात महानुभावांनी आणि वारकऱ्यांनी मराठीतील दर्जेदार साहित्य लिहून, मराठी भाषेला कलात्मक उंचीवर नेले. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी या मराठी भाषेला राज्य कारभारात स्थान दिल्यामुळे ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या मराठी भाषेचा सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन डॉ.विठ्ठल जंबाले यांनी केले. स्वा.रा.ती.म. विद्यापीठच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य व देगलूर महाविद्यालय,देगलूर येथील मराठी भाषा व वाड्:मय विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. विठ्ठल जंबाले हे येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ” मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उद्घाटन सोहळा” कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जंबाले बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते.आभासी तथा दूर दृश्य (झूम) माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात “मराठी भाषेसमोरील आव्हाने ” या विषयावर डॉ. जंबाले यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, ” मराठी ही आज जगातील अनेक देशांमध्ये बोलली जाणारी भाषा असून, मराठीत दर्जेदार साहित्य होत आहे. तसेच सर्व वाड्:मय प्रकारांनी मराठी भाषा समृद्ध आहे.ज्या मराठी मातीत आपण जन्मलो त्या मातीत मराठी भाषेबद्दलचा अभिमान आपण बाळगला पाहिजे.आपण कितीही प्रगती केली तरीही आपण आपली संस्कृती जपली पाहिजे. तिचा विसर पडता कामा नये.म्हणून मराठीला वाव द्या व जगास मी व माझी भाषा ‘मराठी’ आहे, हे गर्वाने सांगा” असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिल मुंढे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मारोती कसाब यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. मोहिनी मेकाले यांनी केले. तर ग्रंथपाल प्रा.पी.एम. इंगळे यांनी तांत्रिक सहाय्य केले. या कार्यक्रमास दूरदृश्य प्रणालीचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!