गुरुगोविंद सिंग यांनी सामाजिक समतेचा पुरस्कार केला – डॉ. नारायण सूर्यवंशी

गुरुगोविंद सिंग यांनी सामाजिक समतेचा पुरस्कार केला - डॉ. नारायण सूर्यवंशी

अहमदपूर (गोविंद काळे) : “गुरु गोविंदसिंग यांनी खालसा पंथाची स्थापना करून समाजाला अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. तसेच समाजाला समतेचे महत्त्व सांगून धर्मतत्वांमार्फत समतेचा पुरस्कार केला “, असे प्रतिपादन शिरूर अनंतपाळ येथील शिवनेरी महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख डॉ.नारायण सूर्यवंशी यांनी केले.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात विविध विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी आभासी तथा दूरदृश्य (झूम ) प्रणाली द्वारे प्रबोधन पंधरवाडयाचे आयोजन करण्यात आले. आज दि. २० जानेवारी रोजी इतिहास विभागाच्या वतीने गुरुगोविंदसिंग यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर आभासी तथा दूर-दृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक तथा प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नारायण सूर्यवंशी उपस्थित होते. ते पुढे बोलतांना म्हणाले की, गुरु गोविंदसिंग यांनी जात-पात, अंधश्रद्धा, सामाजिक अनिष्ठ परंपरा आदींना तिलांजली देऊन सामाजिक ऐक्य निर्माण करण्याचे कार्य केले. शीख धर्मामध्ये गुरुपरंपरा खंडित करून, ‘गुरु ग्रंथ साहिब’ या धर्मग्रंथाला गुरुचे स्थान देण्याचे कार्य गुरु गोविंद सिंह यांनी केले, असेही ते या प्रसंगी म्हणाले.

कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी गुरुगोविंद सिंग यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकून गुरू गोविंदसिंग यांच्या कार्याचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन इतिहास विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार डॉ. संतोष पाटील यांनी मानले. यावेळी आभासी तथा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी व इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!