भारतीय समाज व संस्कृतीचे वैश्विकरण इंग्रजी साहित्यातून – डॉ. अजय टेंगसे यांचे प्रतिपादन

भारतीय समाज व संस्कृतीचे वैश्विकरण इंग्रजी साहित्यातून - डॉ. अजय टेंगसे यांचे प्रतिपादन

मान्यवरांच्या उपस्थितीत ‘रिफ्लेशन ऑफ सोसायटी ॲण्ड कल्चर इन इंडियन लिटरेचर इन इंग्लिश ‘ या ग्रंथाचे प्रकाशन

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय इंग्रजी साहित्यकारांनी भारतीय समाजाचे व संस्कृतीचे वास्तविक चित्रण प्राधान्याने केले. यामुळे भारतीय समाजाचे व संस्कृतीचे वैश्विकरण झाले यामुळेच भारतीय संस्कृतीचे महत्व जगाला समजले असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या मानव्य विधा शाखेचे अधिष्ठाता प्रो. डॉ. अजय टेंगसे यांनी केले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व

किसान शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीर द्वारा संचलित महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूर च्या इंग्रजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. २० डिसेंबर २०२१ रोजी “भारतीय समाजाचे व संस्कृतीचे इंग्रजी साहित्यात प्रतिबिम्ब” या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय राष्ट्रीय ऑनलाईन चर्चासत्राच्या अध्यस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर उद्घाटनाप्रसंगी ज्ञानदेव झोडगे सचिव, किसान शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच उद्घाटक म्हणून प्रो.डॉ. अजय टेंगसे अधिष्ठाता मानव्य विधाशाखा , स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड हे तर बीजभाषक म्हणून सयाजीराव गायकवाड विद्यापीठ वडोदरा गुजरात येथील डॉ. सचिन केटकर हे उपस्थित होते. तसेच साधन व्यक्ती म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे इंग्रजी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. एम.निवर्गी, डॉ. उमेश जगदाळे, संगमनेर , सत्राध्यक्ष म्हणून डॉ. धनंजय देवळालकर , अमरावती आदी ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्रासाठी उपस्थित होते. यावेळी उद्घाटनप्रसंगी पुढे बोलतांना प्रो. डॉ. अजय टेंगसे म्हणाले की, सरोजनी नायडू,मुल्कराज आनंद, नॉयपॉल, भारती मुखर्जी, गिरिष कर्नाड, आनंद मुर्ती आदी साहित्यकारांच्या इंग्रजी साहित्यात भारतीय जनमानसाचे प्रतिबिंब दिसून येते. असे ही ते म्हणाले. या उद्घाटन सत्राचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केला तर आभार उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी मानले.
याप्रसंगी प्रातिनिधीक स्वरूपात डॉ. मीनाक्षी पौनीकर, शुध्दोधन कांबळे, डॉ. मंजु जोशी, डॉ. उज्जवला माळी, डॉ. पद्मा मंथा, प्रा. शिवेश्वर मुचाटे, संशोधक विद्यार्थी योगिता पाटील, डॉ. श्याम जाधव आदी अभ्यासकांनी शोधनिबंध प्रस्तुत केले तर या सत्राचा अध्यक्षीय समारोप डॉ. धनंजय देवळालकर (अमरावती ) यांनी केला तर आभार डॉ. प्रशांत बिरादार यांनी मानले .
या राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोपाप्रसंगी डॉ.उमेश जगदाळे, संगमनेर यांनी मार्गदर्शन केले तर या राष्ट्रीय चर्चासत्राचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केला. या सत्राचे सूत्रसंचलन डॉ. पांडुरंग शितोळे यांनी केले. या चर्चासत्रासाठी देशभरातून शंभरहून अधिक संशोधन , अभ्यासक व प्राध्यापक उपस्थित होते तर पन्नासहून अधिक शोधनिबंध प्राप्त झाले. या शोधनिबंधाच्या ग्रंथाचे प्रकाशन ऑनलाईन पध्दतीने मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या राष्ट्रीय चर्चासत्राचे प्रास्ताविक संयोजक प्रा. अतिश आकडे यांनी केले तर सूत्रसंचलन डॉ. एम. डी. पठाण यांनी तर आभार संयोजक प्रा. अतिश आकडे यांनी मानले.तंत्र सहाय्य प्रा. प्रभाकर स्वामी यांनी केले. तर राष्ट्रगीताने राष्ट्रीय चर्चासत्राची सांगता झाली.

About The Author

error: Content is protected !!