कुलगुरूच्या अधिकारात राजकीय हस्तक्षेप करणारा काळा कायदा तात्काळ रद्द करा

कुलगुरूच्या अधिकारात राजकीय हस्तक्षेप करणारा काळा कायदा तात्काळ रद्द करा

अजितसिंह पाटील कव्हेकरांच्या उपस्थितीत भाजयुमोचे राज्यमंत्री बनसोडे यांना साकडे

लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिने डॉ.सुखदेव थोरात माजी अध्यक्ष विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली व सदरील अहवालाच्या आधारे अधिनियमात प्रस्तावित सुधारणा करण्यास मंत्रीमंडळाने 15 डिसेंबर 2021 रोजी मान्यता दिली. प्र-कुलपती पदाची तरतूद – महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2016 मध्ये नव्याने कलम-(अ) समाविष्ठ करून प्र-कुलपती पदाची तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्रीही विद्यापीठाचे प्र-कुलपती असतील या तरतूदीमुळे मा.राज्यपाल यांच्या अधिकारांचे हनन करण्याचा प्रकार होत असून या कायद्यामुळे सरकारी क्षेत्रामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढणार आहे. त्यामुळे हा काळा कायदा तात्काळ रद्द करावा. अशा मागणीचे निवेदन भाजपा युवा नेते तथा भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या उपस्थितीत भाजपा युमोच्यावतीने राज्याचे पाणी पुरवठा व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मा.ना.संजयजी बनसोडे यांना देण्यात आले.

या कायद्यामुळे कुलगुरू, प्र-कुलगुरू यांच्यासारख्या इतर महत्त्वाच्या नियुक्‍तीत राजकीय हस्तक्षेप वाढणार आहे. शासनाला आपल्याच मर्जीतील व्यक्‍तींची निवड करण्याचे नियोजन होणार असल्यामुळे भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणात होणार आहे. एवढेच नाही तर आपल्या सरकारमधील काही नेत्यांचा डोळा हा केवळ विद्यापीठाच्या जमीनीवर आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री हे विद्यापीठाचे प्र-कुलपती करून विद्यापीठाच्या दैनंदिन कार्यामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढणार आहे. त्यामुळे या काळ्या कायद्याला मान्यता देऊ नये. शैक्षणिक क्षेत्रात होणार्‍या भ्रष्टाचाराला आळा घालून विद्यापीठासारख्या ज्ञानदानाचे कार्य करणार्‍या संस्थेमध्ये राजकीय हस्तक्षेप कमी करून विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी योग्य तो हातभार लावावा. अशा मागण्याचे निवेदन राज्यमंत्री, पाणी पुवरठा व सार्वजनिक बांधकाम मंत्री संजय बनसोडे यांना देण्यात आले आहे. यावेळी युवा नेते तथा भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, अ‍ॅड.गणेश गोजमगुंडे, वैभव डोंगरे, अ‍ॅड.पंकज देशपांडे, व्यंकटेश हंकरगे, संतोष तिवारी, काकासाहेब चौंगुले, राजेश पवार, शुभम स्वामी, महादेव पिटले, ऋषिकेश क्षिरसागर, अमित पोतदार, पंकज भोळे, आकाश पिटले, यशवंत कदम,लक्ष्मण पोतदार, अजय भोळे, चैतन्य फिस्के, महेश साळुंके यांच्यासह भाजपा युमोचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कायदा मागे घेईपर्यंत संघर्ष सुरूच राहील
लातूर शहरामध्ये अनेक शैक्षणिक संस्था आहेत. विद्यापीठ उपकेंद्र आहे. खाजगी क्‍लासेसचीही संख्या मोठी आहे. त्यामुळे शिक्षणासाठी राज्यासह देशभरातून विद्यार्थी येतात. त्यामुळे विद्यार्थी हित लक्षात घेऊन हा काळा कायदा तात्काळ रद्द करावा. हा कायदा बहुमताने पारीत झाला तर लातूरमध्ये शिक्षण घेणार्‍या देशभरातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांवरही या कायद्यामुळे राजकीय प्रभाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थी हिताचा विषय लक्षात घेऊन त्या कायद्याच्या विरोधात भाजपा युमोने साखळी आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे जोपर्यंत हा काळा कायदा शासन मागे घेणार नाही किंवा तो कायदा रद्द करणार नाही. तोपर्यंत भाजपायुमोकडून सुरू असलेला संघर्ष कायम सुरूच राहील. असा ईशारा भाजपायुमोचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!