सावकारीच्या त्रासाला कंटाळून निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांसह कुटुंबातील तिघांची आत्महत्या

सावकारीच्या त्रासाला कंटाळून निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांसह कुटुंबातील तिघांची आत्महत्या

सांगली (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेळंकी येथे निवृत्त पोलिस कर्मचारी अण्णासाहेब गुरुसिद्ध गव्हाणे (वय 65) त्यांच्या पत्नी मालती (वय 55) व मुलगा महेश (वय 28) या तिघांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली आहे. एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याने या घटनेने मिरज तालुका हादरून गेला आहे.

अण्णासाहेब गव्हाणे हे सांगली पोलिस दलातून निवृत्त झालेले होते निवृत्तीनंतर पत्नी मालती व मुलगा महेश यांच्यासह ते बेळंकी या त्यांच्या मूळ गावी राहायला गेले होते. महेश हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. महेश हा शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवूनूक करत होता या कारणाने त्याने काही खाजगी सावकारांकडून कर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे. सावकारी कर्जाची रक्कम सुमारे कोटीच्या घरात असल्याचीही चर्चा आहे या सावकारी वसुलीसाठी सावकारांनी तगादा लावला होता. आर्थिक अडचणीतून गव्हाणे यांनी जमीन, घर व प्लॉट विकले असल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळाली मात्र त्यानंतरही गव्हाणे यांचे सावकारी कर्ज शिल्लक होते. गव्हाणे यांनी पत्नी व मुलासह आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घराची तपासणी केली यावेळी पोलिसांना या ठिकाणी 2 चिठ्ठ्या आढळून आल्या आहेत त्यात काही जणांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यांच्या त्रासाने आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीमध्ये मिळालेले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी चिठ्ठीतील मुद्द्याच्या आधारे चौकशी सुरू केली आहे. गव्हाणे कुटुंबातील तिघांच्या मृत्यूप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास करण्यात येत असल्याची माहिती मिरज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी दिली याप्रकरणी मयत अण्णासाहेब गव्हाणे यांचा पुतण्या राकेश गव्हाणे यांनी मिरज पोलीस ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे. 22 टक्के व्याजदराने बेकायदेशीररित्या पैशाच्या वसुलीसाठी दमदाटी करून मानसिक व शारीरिक त्रास दिला व आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार त्यांनी दिली आहे. पोलिसांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला आहे. तिघांच्या आत्महत्येनंतर घटनास्थळी ग्रामस्थ व नातेवाईक यांनी मोठी गर्दी केली होती. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. एकच कुटुंबातील तिघांच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळतात वरिष्ठ पोलीस अधिकारी लिमिटेड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!