नूतन ग्रामपंचायत सदस्यांनी गावाच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करावा – दिलीपराव देशमुख

नूतन ग्रामपंचायत सदस्यांनी गावाच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करावा - दिलीपराव देशमुख

नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची घेतली सदिच्छा भेट

लातूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या असून त्यात बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस विचाराचे सदस्य निवडूण आले आहेत त्यामुळं सोमवारी आशियाना निवासस्थानी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांची काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी, नूतन ग्रामपंचायत सदस्यांनी भेट घेऊन सत्कार केला यावेळी नूतन सदस्यांना गावाच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे आवाहन राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आज आशियाना निवासस्थानी तोबा गर्दी झाल्याने हाऊस फुल दिसतं होते.

लातूर जिल्ह्यातील औसा, लातूर, चाकुर, रेंनापुर, देवणी, अहमदपूर, शिरूरअनंतपाळ, उदगीर, जळकोट तालुक्यातील ग्रामपंचायती च्या निवडणुका पार पडल्या आहेत जवळपास बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस विचाराचे सदस्य निवडूण आले आहेत त्यामुळं सोमवारी सर्व नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, माजी आमदार अँड त्रिंबक भिसे,जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष एस आर देशमुख, रेणा चे माजी अध्यक्ष आबासाहेब पाटील, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ, रेणा चे चेअरमन सर्जेराव मोरे, उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, जागृती शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मनराव मोरे, जिल्हा काँग्रेस मिडिया चे अध्यक्ष हरिराम कुलकर्णी, विविध गावातील नूतन ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच, सोसायटीचे चेअरमन मोठ्या प्रमाणात उपस्तित होते.

About The Author

error: Content is protected !!