जल आत्मनिर्भर अभियान अंतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा

जल आत्मनिर्भर अभियान अंतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा

पुणे (प्रतिनिधी) : आंबेगाव तालुक्यातील भावडी, कारेगाव, थुगाव, कुरवंडी या चार गावामध्ये वसुंधरा संवर्धन, द क्लायमेट रिॲलिटी, मॅप्स इंडस्ट्रीज प्रा लिमिटेड पुणे यांच्या सहयोगाने व आय सी आय सी बँकेच्या सी एस आर फंडातून जल आत्मनिर्भर अभियान अंतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा दिनांक १२ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद शाळा भावडी येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसुंधरा संवर्धनचे संस्थापक रवींद्र निंबाळकर व कर्नल शशिकांत दळवी होते

पोलिस फ्लॅश न्युजचे सहसंपादक वसुंधरा संवर्धनचे सदस्य केशव नवले यांच्या प्रयत्नामुळे आंबेगाव तालुक्यातील या चारही गावातील लाखो लिटर पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणेमुळे जमिनीत जाणार आहे त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. याकामामुळे उन्हाळ्यातील महिन्यात रोजच्या गरजासाठी पाणी मिळणार व टँकरवर अवलंबून असणारी गावे जलयुक्त होणार असल्यामुळे खऱ्या अर्थाने ही गावे जल आत्मनिर्भर झाली आहे, अशा भावना गावातील गावकरी व उपस्थित लोकांनी व्यक्त केल्या.

यावेळी प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, शिवसेनेचे गटनेते व जिल्हा परिषद सदस्य देवीदास दरेकर, भाजप तालुकाध्यक्ष डॉ ताराचंद कराळे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी द क्लायमेट रिॲलिटी चे आदित्य पुंडिर, मॅप्स इंडस्ट्रीजचे अनिरूद्ध तोडकर, आय सी आय सी आय बँकेचे जयसिंग धुमाळ, कोलको जोअँचीम, वसुंधरा संवर्धनचे उपाधक्ष्य कुलकर्णी, सचिव योगेश शितोळे, सदस्य प्रज्ञा शिंदे, पंचायत समिती सभापती संजय गवारी, सदस्य शीतल तोडकर, अशोकशेठ बाजारे, सोपानराव नवले,
चारही गावाचे सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित कातळे, प्रास्तविक सरपंच महेश नवले व आभार भावडी गावचे पाटील, गावपोलिस पाटील संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे कार्याधक्ष्य गोरक्षनाथ नवले यांनी केले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!