संत रविदासांनी समतेची शिकवण दिली – प्रा.मारोती बुद्रुक पाटील

संत रविदासांनी समतेची शिकवण दिली - प्रा.मारोती बुद्रुक पाटील

झरी (गोविंद काळे) : समाजातील जातिभेद दूर करून मानवतेचा संदेश देताना थोर क्रांतिकारक संत रविदासांनी राष्ट्रहिताला महत्त्वाचे स्थान दिले असून त्यांचे कार्य समतेची शिकवण देणारे होते, युवकांनी त्यांच्या कार्याचा अभ्यास करावा असे आवाहन प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांनी केले. झरी बु येथे थोर क्रांतिकारक संत गुरू रविदास यांच्या सार्वजनिक जयंती महोत्सवात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रख्यात निवेदक,कवि प्रा.मारोती बुद्रुक पाटील बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठलराव घायाळ तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच अजितदादा खंदारे ,माजी सरपंच दयानंद भाऊ सुरवसे, माजी सरपंच बालाजी मेनचेक्रे, सरपंच नागनाथ पाटील पोलीस उपनिरीक्षक ठाणे मुंबईचे ओम वंगाटे, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष राहूल सुरवसे दशरथ भंडे संजय पाटील सिद्धेश्वर शिंदे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना बुद्रुक पाटील म्हणाले की, संत रविदासानी आई-वडिलांची निस्सीम भक्ती केली मानवाच्या कल्याणासाठीच दोह्याच्या रुपाने समाजाला प्रबोधन केले.समतावादी,क्रांतिकारक थोर साहित्यिक,राष्ट्रीय संत म्हणून त्यांचे कार्य राष्ट्रहितासाठी प्रेरणादायी आहे.संत रविदासांनी केलेला उपदेश आजही अंगी करण्यासारखा आहे. भक्तिमार्गातून दिलेला समतावादी संदेश त्यांचे साहित्य आजही लोकांना मोठ्या प्रमाणावर प्रभावित करते.ज्यावेळी मुस्लिम आक्रमक भारतात शिरले त्यावेळी त्याने लादलेला जिझिया कर,बळजबरीने धर्मांतर,मुल्ला काझी, पुराणातील कर्मकांड विषमता,शिक्षण बंदी अंधाधुंद बेबंदशाही व पारतंत्र्या विषयी आणि देशात अगोदरच असलेल्या जाती व अंधश्रद्धा बाबत रोखठोक व परखड विचार दोह्याच्या माध्यमातून त्यांनी प्रहार केला. राष्ट्रहितासाठी कार्य करताना त्यांनी स्वातंत्र्य,समता व बंधुत्वाची बीजे रोवली.मानवाच्या कल्याणासाठी समाजवादी समतेचा विचार देण्याचे कार्य केले.ऐसा चाहु राज मे जहा मिले सबन को अन्न छोटो बडो सब बसे रविदास रहे प्रसन्न.असे सांगत सर्वांना समान न्याय समान हक्क मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी समाजवादी विचार मांडले.आजच्या युवकांनी संत रविदास यांच्या साहित्याचा अभ्यास करून राष्ट्रहितासाठी कार्य करावे असेही प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांनी सांगितले.या वेळी दयानंद सुरवसे व बालाजी मेनचेक्रे यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहू सुरवसे यांनी तर आभार लक्ष्मण घायळ यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोविंद घायाळ, जयपाल घायाळ, महादेव घायाळ,अमोल घायाळ,नामदेव घायाळ, संभाजी घायाळ, ज्ञानेश्वर घायाळ, नितीन वाघमारे, लहू सुरवसे, कृष्णा घायाळ, राम घायाळ, गितेश डोंगरे, फिरोज सय्यद, गिरजाप्पा घायाळ, केशव घायाळ, ओम सुरवसे, ईश्वर घायाळ, इनुस शेख, अंबादास घायाळ, गजानन घायाळ, नागनाथ बामणे, भिवाजी बामणे, कृष्णा वाघमारे आदीने प्रयत्न केले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!