जिल्हा बँकेने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार दिला – अँड प्रमोद जाधव

जिल्हा बँकेने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार दिला - अँड प्रमोद जाधव

जानवळ शाखेत बिन व्याजी ११ लाख रुपये कर्ज वितरण

चाकुर (प्रतिनिधी) : राज्यात अव्वल स्थानावर असलेल्या लातूर जिल्हा बँक माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करत असून जिल्हा बँकेने विविध योजना राबवून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले असून भविष्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नवनवीन योजना राबवून शेतकऱ्यांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा बँक आगामी काळात प्रयत्न करणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव यांनी येथे बोलताना दिली ते शुक्रवारी चाकुर तालुक्यातील जानवळ येथील जिल्हा बँकेच्या शाखेच्या वतीने शून्य दराने ३६ लाख रुपये सभासदांना कर्ज मंजुर करण्यात आले प्राथमिक स्वरूपात ११ लाख आज पिक कर्ज वाटप करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बँकेचे चाकुर येथील संचालक एन आर पाटील यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेसाहेब पाटील व्यासपीठावर अतिथी म्हणून सरपंच भागवत कूसंगे, बँकेचे माध्यम समन्वयक हारिराम कुलकर्णी उपस्थित होते.

जिल्हा बँक बचत गटांना कर्ज देणार – संचालक एन आर पाटील
जिल्हा बँक शेतकरी सभासद याना शून्य टक्के दराने पिक कर्ज वाटप करत शैक्षणीक, शुभमंगल योजना राबवून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे त्याच बरोबर ग्रामीण भागातील महीला बचत गटांना कर्ज देत असून यासाठी सरपंच चेअरमन यांनी पुढाकार घ्यावा महीला बचत गटांना कर्ज देता येईल त्या स्वतः च्या पायावर उभा टाकतील अशा अनेक ठिकाणी महिला बचत गटांना बँकेने सहकार्य केले आहे अनेक ठिकाणी महिला बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक विकास साधत सक्षमपणे उधोग चालवत आहे असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी अशोक नागिमे, जनार्दन खलंग्रे, बळीराम खसे, बळीराम साके, अरविंद साबदे, लालासाहेब धोंडगे, पद्माकर मुरकुटे, बुडे, रामजी केंद्रे, वसंतराव ढोबळे, विजयकुमार सोळंके, राजेश भताने, अंकुश गोमचाळे आदी सोसायटीचे चेअरमन, शेतकरी सभासद, बँकेचे ग्राहक उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!