ग्रामदैवत सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानचा यात्रा महोत्सव तीन दिवस चालणार

ग्रामदैवत सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानचा यात्रा महोत्सव तीन दिवस चालणार

विविध धार्मिक उपक्रमाचे आयोजन

लातूर (प्रतिनिधी) :लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवास सोमवार दि.२८ फेब्रुवारी रोजी प्रारंभ होणार आहे. यंदा हा उत्सव तीन दिवसांचा राहणार असून पारंपरिक धार्मिक उत्सव या कालावधीत संपन्न होणार आहेत.

सोमवार दि.२८ फेब्रुवारी रोजी रात्री गवळी समाजाच्या दुग्धाभिषेकाने महोत्सवास प्रारंभ होणार आहे. मंगळवार दि.१ मार्च रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांच्या हस्ते श्रींची महापूजा होणार असून ध्वजारोहण केले जाणार आहे. यात्रा महोत्सवानिमित्त प्रथेप्रमाणे केले जाणारे झेंडा व काठीचे पूजन यावर्षीही देवस्थानच्या परिसरातच संपन्न होणार आहे. बुधवार दि.२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता हरिपाठ व भजन होईल. गुरुवारी दि.३ मार्च रोजी रात्री ८ वाजता गुरुनाथ महाराज देगलूरकर यांचे काल्याचे कीर्तन संपन्न होईल. रात्री ११ वाजता काला व महाप्रसाद होऊन यात्रा महोत्सवाची सांगता होईल.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यात्रा महोत्सवात पारंपारिक धार्मिक विधी संपन्न होणार आहेत. दर्शनासाठी भक्तांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे मात्र दर्शनासाठी येताना भक्तांनी कोरोना विषयक नियमांचे पालन करावे.ज्ञमास्कचा वापर करावा, असे आवाहन देवस्थानच्या प्रशासक श्रीमती हिरा शेळके, प्रदीप भोसले, विश्वस्त विक्रम गोजमगुंडे, अशोक भोसले, श्रीनिवास लाहोटी, मन्मथअप्पा लोखंडे, सुरेश गोजमगुंडे, चंद्रकांत परदेशी, विशाल झांबरे यांच्यासह यात्रा समिती प्रमुख व सदस्यांनी केले आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!