प्राचार्य डॉ. वसंत बिरादार ‘जगद्गुरू तुकोबाराय साहित्य रत्न’ पुरस्काराने सन्मानित

प्राचार्य डॉ. वसंत बिरादार 'जगद्गुरू तुकोबाराय साहित्य रत्न' पुरस्काराने सन्मानित

अहमदपूर (गोविंद काळे) : साहित्य, पत्रकारिता, शिक्षण क्षेत्र, प्रशासकीय सेवा आणि सामाजिक सेवा या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांना बीड जिल्हा जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचा पहिला ‘जगद्गुरू तुकोबाराय साहित्य रत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

जगद्गुरू तुकोबाराय जयंतीनिमित्त बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील हॉटेल’ इट अँड स्टे ‘ या भव्य सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक नंदकुमार सोमवंशी पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ. प. विष्णूआबा तपसे, प्रा. सुहास माने, डॉ.भारत हांडिबाग, मुजीब काजी, विश्वंभर वराट गुरूजी, प्रमोद जाधव , शिवश्री किसन पवार, प्रा.प्रशांत जाधव, अड.जयसिंग चव्हाण सौ.मानेताई आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांना मानाचा बेटा बांधून, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, जगद्गुरु तुकोबारायांच्या विचारांचे आचरण करणे म्हणजेच त्यांची खरी जयंती साजरी करणे होय. इतिहासात अनेक लबाड्या झालेले असून, त्या शोधून तुकाराम महाराजांचा इतिहास पुन्हा नव्याने लिहिण्याची गरज आहे. त्यांची पत्नी जिजाबाई यांचे तुकारामावर निरतिशय प्रेम होते. हे पती-पत्नी त्या भागात एक आदर्श दांपत्य होते. मात्र इतिहासकारांनी, तसेच चित्रपट, नाटक, कीर्तनातून जिजाबाईचे चित्रण कर्कशा, भांडखोर,कजाग स्त्री असे केलेले असून ते चुकीचे आहे, जिजाबाई तथा आवली ही प्रेमळ व पतीव्रता सांसारीक स्त्री होती. तिने नारायण या आपल्या मुलाला संत तुकारामासारखे कसे घडवले होते,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कार्यक्रमाला प्रसिद्ध कथाकार व वक्ते डॉ.संजय खाडप, कवी केशव कुकडे, सिद्धेश्वर इंगोले, प्रा.गौतम गायकवाड, यांच्यासह अंबाजोगाई येथील मान्यवर नागरिक, महिला तसेच महात्मा फुले महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी.डी. चौधरी, डॉ. मारोती कसाब, डॉ. अनिल मुंढे, डॉ. सतीश ससाणे, अभिनंदन बिरादार, शेख हुसेन शेख, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!