उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेदाचा जीवनात अंगीकार करा – डॉ. बब्रुवान मोरे

उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेदाचा जीवनात अंगीकार करा - डॉ. बब्रुवान मोरे

अहमदपूर ( गोविंद काळे) : “आजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या काळातही उत्तम आरोग्य लाभावे असे वाटत असेल तर, आयुर्वेदाच्या आधारे जीवन जगावे “, असे प्रतिपादन डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले. येथील महात्मा फुले महाविद्यालयात विद्यार्थी प्रबोधन पंधरवड्याच्या निमित्ताने संस्कृत विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या” उत्तम स्वास्थ्यासाठी आयुर्वेद”, या विशेष व्याख्यानात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते यावेळी विचार मंचावर प्रमुख मार्गदर्शक डॉ.बब्रुवान मोरे हे उपस्थित होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, कार्यालय अधिक्षक प्रशांत डोंगळीकर यांची व कार्यक्रमाचे संयोजक डॉ. प्रशांत बिरादार यांची उपस्थिती होती .

यावेळी पुढे बोलताना डॉ. मोरे म्हणाले की, आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी असून, कोरोनाच्या काळात संपूर्ण जगाला भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदाचे महत्त्व समजले. सर्वांनी प्राणायाम, योगा व आयुर्वेदाचा जीवनात अंगिकार करावा.असेही ते म्हणाले.तसेच यावेळी त्यांनी विविध प्रकारच्या आजारांवर घरगुती उपचार आणि आयुर्वेदिक औषधांविषयीही माहिती दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपा प्रसंगी प्राचार्य डॉ वसंत बिरादार पाटील म्हणाले की, आयुर्वेद म्हणजे माणसाला निसर्गाशी एकरूप होण्याचा मूलमंत्र देणारी महान ज्ञानशाखा असून, आयुर्वेदिक तत्त्वप्रणालीचे आयुष्यात उपयोजन करुन प्रत्येकाने सुंदर सहजीवनाचा मनमुराद आनंद घेतला पाहिजे. शंभर वर्ष जगण्यासाठी प्रत्येकाने जेवणातून मीठ साखर मैदा हद्दपार केले पाहिजे व आयुर्वेदात सांगितलेली आहार, विहार आणि विचार पद्धती चा अंगीकार करावा असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संयोजक डॉ. प्रशांत बिरादार यांनी केले तर आभार डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते तर आभासी तथा दूरदृश्य ( झूम ) प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येंने उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम्‌ ने तर सांगता राष्ट्रगीताने झाली.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!