कोपरा ग्रामपंचायतीत नवीन रमाई घरकुल आणि बाला उपक्रमाचा गटविकास अधिकारी अमोलकुमार अंदेलवाड यांनी घेतला आढावा

कोपरा ग्रामपंचायतीत नवीन रमाई घरकुल आणि बाला उपक्रमाचा गटविकास अधिकारी अमोलकुमार अंदेलवाड यांनी घेतला आढावा

प्रत्यक्ष गटविकास अधिकारी कोपरा शाळेत

किनगांव (गोविंद काळे) : मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न ,वस्त्र , निवारा ,आरोग्य आणि शिक्षण होय या गरजा भागविण्याचा प्रयत्न मानव करत असतो याची जबाबदारी शासन घेऊन सोडविण्याचा अविरतपणे प्रयत्न करते प्रत्येक मानवाला पोटभर अन्न , अंगभर कपडे, आणि राहण्यास स्वतःचे सुंदर घर असावे असे वाटते या अनुषंगाने शासन स्तरावर महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील लोकांसाठी स्वतःचे सुंदर आणि स्वच्छ घर असावे बेघरांचे स्वतःच्या हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रमाई आवास योजना राबविली जात असताना ज्यांना घराची आवश्यकता आहे त्यांना लाभ मिळतो की नाही आणि ज्यांना लाभ मिळाला ते प्रत्यक्ष घरात राहतात काय ?नवीन रमाई घरकुलसाठी जे पात्र लाभार्थी आहेत त्यांनी प्रत्यक्ष घराचे बांधकाम सुरू केले आहे काय? मनरेगा चे इंजिनियर राहुल कोराळे ,ग्रामसेवक रविंद्र क्षिरसागर, सरपंच गंगाधर देपे, उपसरपंच प्रा बालाजी आचार्य, कार्यरत आहेत काय? यासंदर्भात आणि इतर विकास योजनांचा आढावा त्याच बरोबर मनरेगाच्या माध्यमातून 90 दिवसाचा रोजगार आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधण्यात आलेले शौचालय वापरासाठी प्रवृत्त करणे, गायरान आणि गावठाण जमीनीवर होत असलेले अतिक्रमण रोखणे, अतिक्रमण करणाऱ्यावर कडक पोलीस दंडात्मक कारवाई करणे, कर वसुल करणे, स्वच्छ पाणी पुरवठा करणे, शेतकऱ्यासाठी शिवरस्ते पांदन रस्ते आणि एमआरईजीएस मार्फत विहीरी घेणे आदि गावातील विकास कामे यासंबंधीचा आढावा मंगळवार दि ०२ फेब्रुवारी २०२१ रोजी सायं ५ .००अहमदपूर तालुक्यातील कोपरा ग्रामपंचायतीत घेत असताना अपंग दिव्यांग यांना काय मदत केली गावातील अंगणवाडी ,जिल्हा परिषद केद्रिय प्रा शाळा यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून बाला उपक्रमांतर्गत शाळेची रंगरंगोटी, प्रेरणास्थान महापुरुषांचे फोटो ,चित्र प्रदर्शने, उजळणी, स्वयं अध्यापनाचे धडे मिळणारे दिशादर्शक फलके , नकाशे आदिमुळे बालकांच्या बुध्दीला चालना मिळेल सृजनशील विद्यार्थी बनविण्यासाठीची तयारी कशी आणि किती झालेली आहे याचा आढावा घेऊन प्रत्यक्ष गटविकास अधिकारी अमोलकुमार अंदेलवाड जि प के प्रा शाळा कोपरा येथे गेले आणि प्रत्यक्ष पाहणी करून बाला उपक्रमाच्या कामाचे कौतूकही केले काही सुचनाही उपस्थीत ग्रामसेवक रविंद्र क्षिरसागर, संगणक परिचालक शिवाजी पिटाळे,सेवक अंगद गोरे, संतराम तरुडे, सरपंच गंगाधर देपे, उपसरपंच प्रा बालाजी आचार्य,व्हा चेअरमन मधुकर सुर्यवंशी, विस्तार अधिकारी डी व्ही सुडे, घरकुलचे इंजि राहुल कोराळे, इंजि अनिल मिरकले, नरेगा इंजि शिवम फुलारी, स्थापत्य अभियंता विशाल भोसले ,केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक प्रल्हाद केंद्रे आणि शिक्षकाना देऊन ग्रामपंचायत विकास कामात अग्रेसर असल्याचे समाधान मानले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!