कोण म्हणतंय गुटख्याला बंदी? विठ्ठल करतोय निलंगा येथे खुलेआम विक्री

कोण म्हणतंय गुटख्याला बंदी? विठ्ठल करतोय निलंगा येथे खुलेआम विक्री

निलंगा (दिपक पाटील जिल्हा प्रतिनीधी) : राज्यात गुटखा बंदी असली तरीही ईतर राज्यातून गुटखा आणला जात असल्याची माहीती सुञाकडून देण्यात आली, यात प्रामुख्याने कर्नाटक व आंध्रप्रदेश येथून गुटखा आणला जात असून, सर्वाधिक गुटखा कर्नाटक मधून आणला जातो. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात गुटख्याची गोदामे असून, हा गुटखा विक्रेत्यांपर्यंत पोहोचवणारी मोठी यंत्रणा आहे, अशी माहिती काही लोकांकडून सांगितली जाते. कोरोणामुळे सर्वत्र लाॅकडाऊन झाला होता. त्यामुळे लोकांचे रोजगार गेले आहेत, तर काहींना खायला अन्न देखील मिळाले नाही, मात्र लातूर जिल्ह्य़ातील निलंगा येथे व्यसनी लोकांचे चोचले पुरवले जात आहेत. राज्य सरकारने गुटखा आणि पानमसाल्यावर बंदी आणली असली तरीही त्याची छुप्या पद्धतीने विक्री होत आहे. अन्न औषध प्रशासन व पोलीस प्रशासन गेल्या चार महिन्यांपासून अनेक ठिकाणी धाडी टाकून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला व गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली, मात्र निलंगा तालुक्यातील विठ्ठल हा ईनामदार असल्याचे ढोंग करत किराणा मालाचे व्यापारी असल्याचे भासवून आपला गोरख धंदा चालु केला आहे. चालू असले तरीही ते कोणाला माहीत कसे होत नसतील? विठ्ठल ईमानदार ला कोणाचा वरदहस्त आहे का? याची उलट सुलट चर्चा बाजारात होत असते, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्था मध्ये असलेल्या मॅग्नेशियम कार्बोनेट सारख्या घातक घटकांमुळे कॅन्सर सारखा गंभीर आजाराचा सामना करावा लागतो, तंबाखूजन्य पदार्थामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडू नये यासाठी राज्य सरकारने २०१२ पासून गुटख्याची निर्मिती व विक्रीवर कायदेशीर बंदी घातली आहे, या निर्णयाला १० वर्ष उलटली मात्र कायद्यातील पळवाटा आणि सरकारी यंत्रणांची नजर चुकवून छुप्या मार्गाने आणि चढ्या दराने गुटखा राजरोस पणे विक्री चालू आहे. निलंगा शहरात कोणत्या ही पानटपरी वर हा प्रतिबंधात्मक असलेला गुटखा उपलब्ध असतो.

ओळखीच्या लोकांनाच मिळतो गुटखा राज्यात गुटखाबंदी असतानाही मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री केली जाते, कार्यवाही होऊ नये म्हणून दुकानदाराकडून फक्त नेहमीच्याच ग्राहकांना गुटखा विक्री केली जाते. नवीन विक्रेत्यांना गुटखा विकताना बर्‍याच चौकशीच्या फेऱ्यांचा सामना करावा लागतो. गुटखा विक्री करताना नेहमीच्या तुलनेत जास्त पैसे द्यावे लागतात, गुटख्या ला पर्याय म्हणून घासून सुपारी दिली जाते, त्यामध्येही तंबाखूचा वापर होत असल्याने तो तयार करणे आणि त्याची विक्री करणे बेकायदेशीर आहे. याकडे दुर्लक्ष करून सर्रासपणे सर्वच पानटपरी वर घासून सुपारी दिली जाते, तरूणाईला व्यसन जडल्याने पानटपरी वर नेहमीच गर्दी दिसून येत असते. याकडे अन्न भेसळ विभाग व पोलीस प्रशासन लक्ष देणार का? निलंगा येथील गुटखा बंद होईल का? अशी चर्चा जनसामान्य लोकात होत आहे .

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!