जनावरे चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

जनावरे चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

उदगीर ग्रामीण पोलिसांची कारवाई; 6 लाख 17 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर शहर तालुका आणि परिसरातील शेतकऱ्यांची जनावरे चोरून नेऊन हैदराबाद येथे स्वस्तात विक्री करायची आणि पैसे कमवायचे, असा धंदा करणाऱ्या काही लोकांना उदगीर ग्रामीण पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उदगीर नव्हे तर लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी शेतकऱ्यांची जनावरे रात्री चोरुन न्यायचे आणि शेतकऱ्याच्या ओळखीच्या व्यक्तीकडून मध्यस्थी करून त्या शेतकऱ्याला त्याच्या मालकीचेच जनावरे अर्ध्या किमतीवर विकायचे! असा प्रकार यापूर्वी महाराष्ट्रा लगत असलेल्या कर्नाटक सेनेतील हुल्लाळ भागात काही चोरट्यांची शैली होती!

 मात्र  मध्यंतरीच्या काळात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवंश हत्या बंदीला विरोध केला. त्यासाठी स्वतंत्र कायदा बनवला, आणि या कायद्याच्या अनुषंगाने जबर शिक्षा ही तरतूद केली. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन काही चोरटे गोवंश किंवा इतर जनावरांची चोरी करून हैदराबाद बाजारात मटन विक्रीसाठी ही जनावरे विकू लागली. कित्येक वेळा बेवारस असलेली जनावरे, रस्त्यावर मोकाटपणे फिरणारी जनावरे हे तर या चोरट्यांनी फस्त केलीच केली, त्यानंतर त्यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या गाई-म्हशी चोरून चोरट्या बाजारात विक्रीचेही काम सुरू केले.

 उदगीर तालुक्यातील शेकापुर येथील बाबुराव नामदेव शेल्हाळे यांनी अत्यंत कष्टाने गाई म्हशी पालन करून दूध डेरी चा धंदा चालवला होता. शेतीला पूरक धंदा म्हणून दुधाच्या धंद्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालू होता. मात्र चोरट्यांनी यांच्या मराठवाडा पातळीवरील पशु प्रदर्शनात प्रथम आलेल्या गाईचसह इतरही चार गाई आणि म्हशी चोरून नेल्या. यासंदर्भात बाबुराव नामदेव शेल्हाळे यांनी उदगीर ग्रामीण पोलिसात रितसर फिर्याद दिली होती. या फिर्यादी सोबतच इतरही अनेकांनी या दरम्यानच्या काळात जनावरे चोरी झाल्याची फिर्याद दिल्याने उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उदगीर उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल जॉन बेन यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस पथक तपासकामी लावले.

 या पथकात सपोनी घारगे, पल्लेवाड आणि गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस नाईक नामदेव सारोळे, चंद्रकांत कलमे, माधव केंद्रे, घोडके, तुळशीराम बरूरे, राहुल गायकवाड, नाना शिंदे यांना नियुक्त करून या गुन्हे प्रगटीकरण करण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना दिल्या.

 वरिष्ठांच्या सूचनेनुसार या तपास पथकाने योग्य तो तपास करून आरोपीतांना हैदराबाद( तेलंगणा राज्यातून) चतुर्भुज केले. यामध्ये आरोपी किशोर सखाराम कांबळे, शरदकुमार नंदकुमार श्रीडोळे रा. बनशेळकी रो,ड उदगीर, सुलेमान सलीम सय्यद रा. किल्ला गल्ली उदगीर, सद्दाम गुल रशीद कुरेशी रा. हळी तालुका उदगीर, पाशा शेख राहणार गल्ली पेठ मंडल नरसिंगी हैदराबाद, तेलंगणा राज्य यांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केले. गुरांची चोरी गेलेल्या जनावरांच्या बाबतीत विचारपूस करून त्यांच्याकडून सहा लाख 17 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या आंतरराष्ट्रीय जनावर चोरी टोळीकडून उदगीर परिसरातील नव्हे तर लातूर आणि सीमावर्ती भागातील अनेक गुन्हे उघडकीस येतील अशी शक्यता उदगीर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पशू प्रदर्शनात प्रथम आलेल्या गाई, वळू यांची चोरी करून दुष्ट भावनेने हैदराबाद येथे विक्री करून आपला स्वार्थ साधण्यासाठी शेतकऱ्याचे दैवत असलेल्या आणि उपजीविकेचे साधन असलेल्या जनावरांना  मटणासाठी कत्तल केली गेल्याचेही यासंदर्भात बोलले जात आहे. अधिक तपासाअंती काही जनावरे जिवंत असून ती जनावरे लवकरच संबंधितांच्या हवाली केले जातील, अशी खात्री या गुन्हे प्रकटीकरण विभागातील प्रमुख असलेले पोलिस नायक नामदेव सारोळे, चंदू कलमे यांनी बोलून दाखवले आहे. ग्रामीण पोलिसांनी अल्पावधीत मोठी धाडसी कारवाई करून आंतर राज्य पातळीवर चोऱ्या करणाऱ्या गुन्हेगारांची टोळी अटक केल्याबद्दल ग्रामीण पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!