पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ ४० झाडांचे रोपण

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ ४० झाडांचे रोपण

प्रत्येक झाडाला शहीद जवानांच्या नावाची पाटी – ग्रीन लातूर वृक्ष टीमचा उपक्रम

लातूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिसरात वृक्ष लागवड व वृक्ष संगोपन यामध्ये अग्रेसर असलेल्या ग्रीन लातूर वृक्ष टीमने कार्याचा ६२७ वा अविरत दिवस साजरा करत, लातूर शहरातील नवीन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या ४० जवानांच्या स्मरणार्थ ४० मोठी झाडे लावून शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करत प्रत्येक झाडाला शहीद जवानांच्या नावांच्या पाट्या लावण्यात आल्या.

यावेळी एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, उपसंचालक आरोग्य सेवा लातूर परीमंडळ डॉ. एकनाथ माले, सायबर क्राईमचे आवेज काझी, उद्योजक विशाल राठी, ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, महानगर पालीका नगरसेवक इम्रानजी सय्यद उपस्थित होते. अत्यंत आगळावेगळा उपक्रम राबविल्याबद्दल एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी ग्रीन लातूर वृक्ष टीम सद्स्यांचे कौतुक केले. कोरोना काळात जगण्याकरीता ऑक्सीजन विकत घ्यावे लागत होते, त्यामुळे ज्यांना कोरोना झाला होता त्यासर्वांनी आपल्या परीसरात झाडे लावून त्यांचे संगोपन करावे असे आवाहन उपसंचालक आरोग्य सेवा लातूर परीमंडळ डॉ. एकनाथ माले यांनी केले.

हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी गंगाधर पवार, कल्पना फरकांडे, ॲड. वैशाली यादव-लोंढे, बाळासाहेब बावणे, बळीराम दगडे, रुषीकेश दरेकर, शिवशंकर सुफलकर, सिताराम कंजे, महेश गेलडा, जफर शेख, सुलेखा कारेपुरकर, आशा अयाचित, श्रुती लोंढे, सुरज पाटील, महेश भोकरे, विजयकुमार कठारे, मोईझ मिर्झा, ॲड. सर्फराज पठान, कुंदन सरवदे, नागसेन कांबळे, प्रमोद वरपे, दयाराम सुडे, खाजाखॉ पठान, पठाण, बालाजी उमरदंड, अभिजीत चिल्लरगे, डॉ. अमृत पत्की, प्रसाद शिंदे, नितीन पांचाळ, अरविंद फड, तौसीफ सय्यद इत्यादी सर्वांनी वृक्ष लागवडीकरीता खड्डे खोदणे, झाडे आणणे, काळी माती आणणे, झाडे लावणे, पाणी देणे याकरीता श्रमदान केले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!