पोलिसांच्या नाकावर टिचून चोरटे ठरतात भारी !!!
उदगीर शहरातून आणखी एका ऑटोरिक्षाची चोरी !!!

पोलिसांच्या नाकावर टिचून चोरटे ठरतात भारी !!!<br>उदगीर शहरातून आणखी एका ऑटोरिक्षाची चोरी !!!

उदगीर / एल.पी.उगीले : महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा, तेलंगणा या चार राज्याच्या सीमेवर असलेल्या उदगीर तालुक्यातून दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहने चोरीला नेऊन कमी किमतीमध्ये इतर राज्यात विकणे, किंवा त्या वाहनाचे सुटे भाग करून त्याची विक्री करणे. असे उद्योग धंदे करणारे चोरटे सक्रिय झाल्याची चर्चा आहे. एखादी टोळीच असावी अशी ही शंका आता ऑटो रिक्षा चालकांमध्ये व्यक्त केली जात आहे. पोलिसांची बघायची आणि रामभरोसे भूमिका कर्तबगार पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाला काळीमा फासणारी आहे. कित्येक वर्षानंतरही आजही उदगीर मध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक दिनकरराव शिंदे, दीपक जतकर यांचे नाव गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून उदगीरकर घेतात. कर्तबगार पोलीस अधिकाऱ्यांना उदगीरची जनता सतत डोक्यावर घेत असते, त्यांचा योग्य सन्मानही करते त्यामुळेच इतक्या वर्षानंतरही त्यांचा नाम उल्लेख आवर्जून केला जातो.
या गोष्टीचे गांभीर्य डोळ्यासमोर ठेवून उदगीर पोलिसांनी काम करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. कारण उदगीर शहरातून मागच्या काही महिन्यांमध्ये तीन-चार ऑटोरिक्षा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेण्याच्या घटना घडल्या आहेत. ऑटोरिक्षा पळविणारे रॅकेट उदगीरात सक्रिय झाल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान ऑटोरिक्षा चोरीच्या घटना वाढल्याने ऑटो चालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
काशीराम तांडा ( ता. उदगीर ) येथील रहिवाशी असलेले फिर्यादी ऑटो चालक गणेश शिवाजी चव्हाण यांनी त्यांचा ऑटो रिक्षा क्रमांक एम. एच. २४ इ ६१३४ हा
रात्री साडेसात ते साडेआठ वाजताच्या सुमारास उदगीर शहरातील चर्च रोड परिसरात पार्किंगला उभा केला होता. पार्किंगला उभा असलेला ५० हजार रुपये किमतीचा जुना ऑटोरिक्षा अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. अशी तक्रार ऑटोचालक गणेश शिवाजी चव्हाण यांनी उदगीर शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरून सोमवारी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा र. नं. २४ / २३ कलम ३७९ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोहेकॉ गोलंदाज हे करीत आहेत.
उदगीर शहरात मागच्या काही महिन्यापासून ऑटोरिक्षा चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे उदगीरात ऑटो रिक्षा चोरीचे रॅकेट सक्रिय झाल्याची चर्चा ऑटो चालकांमधून ऐकण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये उदगीर शहरातून तीन ते चार ऑटोरिक्षा अज्ञात चोरट्याने चोरून घेऊन गेले आहेत. परंतु ऑटोरिक्षा चोरट्यांना पकडण्यात उदगीर शहर पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. उदगीर शहरात चोरीच्या घटना वाढल्यामुळे येथील पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी उदगीर मधील चोरीच्या घटना रोखण्यासाठी आणि चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी कार्यक्षम अधिकारी द्यावा. अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!