संवेदनशील विचारांची घुसमट म्हणजे न पाठवलेली पत्रे – बालाजी मुंडे

संवेदनशील विचारांची घुसमट म्हणजे न पाठवलेली पत्रे - बालाजी मुंडे

उदगीर (एल.पी.उगीले) : संवेदनशील विचारांना संयमाने व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे पत्र. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांना आपले आयकॉन मानून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती या विचारांचा अंगीकार करत इतरांबद्दलच्या आपल्या उत्कट भावना पत्राच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने लिहिलेली पत्रे ज्यामध्ये संवेदनशील विचारांचे घुसमट होते, अशा शिल्लक पत्रांचा संग्रह म्हणजे न पाठवलेली पत्रे होत. असे मत प्रसिद्ध गझलकार बालाजी मुंडे, “बिनधास्त” किनगावकर यांनी व्यक्त केले.

कचरूलाल मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या वाचक संवादाच्या 281 व्या पुष्पात राजेसाहेब कदम लिखित न पाठवलेली पत्रे या साहित्यकृतीवर बालाजी मुंडे, बिनधास्त किनगावकर यांनी वाचकांशी संवाद साधताना पुढे म्हणाले की, सर्वसामान्यांच्या मनातील वैचारिक प्रवाहाचा अविष्कार व त्यातून मिळणारा स्वानंद घेत पत्रातील विचारांना न्याय देण्याचा प्रयत्न लेखक, प्रसिद्ध साहित्यिक राजेसाहेब कदम यांनी या पुस्तकात केला आहे. शेवटी अध्यक्षीय समारोपात कचरूलाल मुंदडा म्हणाले की, संवेदनशील विचारांच्या पत्रावर आपले बेधडक मनोगत व्यक्त करताना लेखकाला योग्य न्याय देण्याचे काम संवादक मुंडे यांनी केले असून राजेसाहेब कदम यांनी न पाठवलेल्या पत्रांचा संग्रह प्रकाशित करून आम्हा वाचकांना एक वेगळा विचार दिलेला आहे. कार्यक्रमाचे संचालन संयोजक अनंत कदम यांनी केले तर आभार तुळशीदास बिरादार यांनी मानले.

कार्यक्रमास प्रा.अनिल चवळे, सुरेश वजनम, सूर्यकांत पाटील, प्रतिभा वजनम, जाधव ताई, सुचिता कदम, उमाताई ढगे, डॉ शेटकार एम.बी.आदींसह वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!