नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना न्याय द्या – परिचारिका संघटनेचे अध्यक्ष भक्तराम फड

लातूर (एल.पी.उगीले) : संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नर्स, कंपाउंडर म्हणून समाजसेवा करण्याच्या उद्देशाने प्रेरित झालेल्या विद्यार्थिनींना लुबाडण्यासाठी काही संस्थाचालकांनी मान्यता नसतानाही विद्यार्थ्यांना नर्सिंग कोर्सला प्रवेश दिलेला आहे. यासंदर्भात वर्धा जिल्ह्यात काही संस्था चालकांनी बोगस नर्सिंग महाविद्यालय काढून विद्यार्थिनींची फसवणूक केली आहे. त्या संदर्भात सविस्तर चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे. कारण शिक्षणाच्या बाजारीकरणात हजारो विद्यार्थिनींचे भविष्य अंधारमय होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. एका बाजूला त्यांची आर्थिक लूट झालेली आहे. तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान ही होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. या गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन शासनाच्या वतीने सर्व बोगस नर्सिंग कॉलेजचे मान्यतेचे प्रस्ताव पडताळून घ्यावेत, तसेच ज्या कॉलेजला परवानगी नसतानाही भरती झालेली आहे. त्या विद्यार्थिनींचे मूळ कागदपत्रे आणि शुल्क भरलेले पैसे परत द्यावेत. अशी मागणी भक्तराम फड यांनी केलेली आहे. तसेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची परवानगी नसताना या कॉलेजनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करून त्यांची आर्थिक लूट केलेली आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जावी. अशीही मागणी केलेली आहे.

नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना न्याय द्या - परिचारिका संघटनेचे अध्यक्ष भक्तराम फड

कित्येक महाविद्यालयांमध्ये विधवा, परितक्ता महिला, मध्यमवर्गीय सुशिक्षित बेकार, काम करून लोन घेऊन शिकणारे व सर्व मध्यम वर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनी असल्याने त्यांना भाड्याने रूम घेऊन राहणे परवडणारे नाही. तरी या संदर्भात ताबडतोब चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. ही अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे. न्याय न मिळाल्यास महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल समोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही सदरील निवेदनात देण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थिनींची फसवणूक झाली आहे. याचा गांभीर्याने विचार करून भविष्यात दुसऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, या दृष्टीने योग्य ती कारवाई करावी. तसेच विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या वर योग्य कारवाई करावी. तसेच त्या ठिकाणी भरलेल्या कर्मचारी वर्गाचा ही सहानुभूती पूर्ण विचार केला जावा. त्यामुळे महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलने व महाराष्ट्र नर्सिंग पॅरामेडिकल स्टेट बोर्ड तसेच राज्य शासनाने सर्व कॉलेजची तात्काळ चौकशी करावी. अशी मागणी परिचारिका संघटनेचे अध्यक्ष भक्तराम फड यांनी केली आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!