दलीत वस्तीत अकरा बोअरसाठी शासनाकडून 13.60 लाख रूपये मंजूर..!

दलीत वस्तीत अकरा बोअरसाठी शासनाकडून 13.60 लाख रूपये मंजूर..!

डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या सातत्यपूर्ण पाठपूराव्यास यश…!!

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील वेगवेगळ्या दलित वस्तीमध्ये शासनाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेतून अकरा ठिकाणी बोअर घेण्यासाठी तेरा लाख साठ हजार एवढा निधी युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी राज्याच्या पाणीपुरवठा विभागाकडून मंजूर करून आणला आहे.तसे पत्र नूकतेच नगरपरिषदेला प्राप्त झाले असून निविदा प्रक्रिया होवून शहरात नवीन 11 बोअर घेण्यात येणार आहेत.

नगर पालिकेने दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत बोअर घेण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता मात्र हा प्रस्ताव प्रलंबित होता.दरम्यान येथील युवकनेते डाॅ. सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी या बाबत राज्याच्या पाणीपुरवठा विभागाकडे पत्रव्यवहार करून दलित वस्तीत बोअरचे नितांत गरज असल्याचे निदर्शनास आणले.त्या नुसार शासनाने जिल्हाधिकारी लातूर यांना पत्र देवून रितसर प्रस्ताव तातडीने पाठविण्याच्या सूचना केल्या त्यानुसार जिल्हाधिकारी लातूर यांनी या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देऊन निधीसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता.

या संबंधाने वेळो वेळी पाणी पुरवठा मंत्री,पाणीपुरवठा राज्यमंत्री यांच्याकडे या बाबत लक्ष वेधून अहमदपूर नगर परिषदेकडे बोअर घेण्यासाठी निधी मंजूर करून आणला आहे.नूकतेच राज्यशासनाने या बाबत आदेश आले असून पालिकेनेही निविदा प्रक्रिया सूध्दा केली असून लवकरच शहरातील बौध्द नगर, सिध्दार्थ नगर, हनुमान टेकडी, शिवाजीनगर, गायकवाड काॅलनी, दर्गपूरा,भारत काॅलनी, इंदीरानगर, साठेनगर खाटिकगल्ली, पंचशिल नगर येथे इत्यादी दलीत वस्तीत बोअर घेत ए जाणार आहेत.

एक सामान्य कार्यकर्ता म्हणून गेल्या वर्षभरापासून सातत्याने शासनाकडे पाठपूरावा करून निधी अभावी प्रलंबित असलेला प्रश्न सोडविण्यास यश मिळाले असून सदरील बोअरमूळे शहरातील दलीत वस्तीतील पाण्याची टंचाई कांही प्रमाणात तरी सुटण्यास मदत झाली आहे असे मत या प्रकरणाचा पाठपूरावा करणारे युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी व्यक्त करून शहराच्या दलीत वस्तीत पाणी पुरवठ्यासाठी निधी मंजूर केल्या बद्दल पाणीपुरवठा राज्यमंत्री संजयजी बनसोडे,जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज, जिल्हाप्रशासन अधिकारी सतिश शिवणे, मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे, अभियंता गणेश पुरी यांचे आभार व्यक्त केले आहेत.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!