कोविड रुग्णांचे शोषण थांबवा; लुबाडणाऱ्या डॉक्टरांवर दंडात्मक कारवाईची मागणी

कोविड रुग्णांचे शोषण थांबवा; लुबाडणाऱ्या डॉक्टरांवर दंडात्मक कारवाईची मागणी

उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांचे मुख्य सचिवांना निवेदन

लातूर (प्रतिनिधी) : जगभराला वेठीस धरणार्‍या कोरोना या महामारीत डॉक्टर हे खऱ्या अर्थाने देवदूत आहेत. जवळपास सर्वच डॉक्टर रुग्णांना दुरुस्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.परंतु या महामारीचा फायदा घेऊन अनेक डॉक्टरांकडून रुग्ण व त्याच्या नातेवाईकांचे आर्थिक व मानसिक शोषण केले जात आहे.राज्य शासनाच्या निर्देशानंतरही लाखो रुपयांची बिले वसूल केली जात आहेत.अशी लुबाडणूक करणाऱ्या डॉक्टरांवर दंडात्मक कारवाई करावी. अनधिकृतपणे घेतलेले पैसे रुग्णांना परत करायला लावावेत अन्यथा या प्रकाराच्या विरोधात कायदेशीर लढाई लढावी लागेल,असा इशारा लातूरचे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी राज्य शासनाच्या मुख्य सचिवांना पाठविलेल्या निवेदनात दिला आहे.
उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी आरोग्य विभागाचे सचिव,लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.,मनपा आयुक्त अमन मित्तल आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या लातूर शाखेच्या अध्यक्षांनाही यासंदर्भात निवेदन दिले आहे.

उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी म्हटले आहे की,कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने दि.३१ ऑगस्ट २०२० रोजी अधिसूचना काढून कोविड रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचारांचे दर ठरवून दिले आहेत.या दरानुसारच उपचार करावेत अन्यथा कारवाई केली जाईल,असेही सरकारने सुचित केले आहे.परंतु या सूचनेकडे डॉक्टर मंडळी दुर्लक्ष करत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा गैरफायदा घेऊन अवाजवी बिले आकारली जात आहेत.

अतिदक्षता विभागाच्या एका खोलीत ३ ते ४ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. प्रत्येकाकडून स्वतंत्रपणे ७ हजार ५०० रुपये प्रतिदिन याप्रमाणे शुल्क आकारले जात आहे.याच शुल्कात रक्त तपासणीही समाविष्ट असताना पॅथॉलॉजिकल चार्जेस वेगळे आकारण्यात येत आहेत.

सॅनिटायझेशन साठी एकूण बिलाच्या ५ टक्के रक्कम घेतली जात आहे.एका रुग्णाला पीपीई किट साठी जास्तीत जास्त १२०० रुपये आकारणे अपेक्षित असताना तसेच एका खोलीत जेवढे रुग्ण आहेत त्या प्रत्येकात ही रक्कम विभागली जाणे आवश्यक असताना प्रत्येक रुग्णाकडून प्रतिदिन १२०० रुपये वसूल केले जात आहेत. प्रत्येक रुग्णालयासाठी एक नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आलेला आहे.त्या अधिकाऱ्याने प्रमाणित केल्यानंतरच बिल स्वीकारणे आवश्यक आहे.परंतु त्यालाही फाटा दिला जात आहे.

कोरोनाच्या परिस्थितीत देवदूताप्रमाणे अनेक डॉक्टर्स व रुग्णालये रुग्णांचे प्राण वाचविता आहेत. परंतु काही ठराविक मंडळी या परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत.खरेतर डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी योग्य नाही पण डॉक्टरांनीही जबाबदारीचे भान ओळखणे आवश्यक आहे.त्यामुळे संबंधित डॉक्टरांनी राज्य शासन शासनाच्या अधिसूचनेप्रमाणे वैद्यकीय बिले अकरावीत. अनधिकृतपणे घेतलेले पैसे रुग्ण व नातेवाईकांना परत करावेत,अन्यथा साथरोग प्रतिबंध कायदा १९८७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व संदर्भीय अधिसूचनेचे उल्लंघन केल्यामुळे कायद्यातील तरतुदीनुसार त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी उपमहापौर बिराजदार यांनी केली आहे.

सचिवांनी संबंधित रुग्णालये व डॉक्टरांना अधिसूचनेचे कटाक्षाने पालन करण्याचे आदेश द्यावे. संबंधितावर कायदेशीर कारवाई करून रुग्णांचे आर्थिक व मानसिक शोषण थांबवावे,अन्यथा कायदेशीर लढाई लढावी लागेल,असा इशाराही उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी या निवेदनात दिला आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!