समाज माध्यमाद्वारे अनेकांना ब्लॅकमेल, मैत्री करताना सावधगिरी बाळगा – पोलिसांचे आवाहन 

समाज माध्यमाद्वारे अनेकांना ब्लॅकमेल, मैत्री करताना सावधगिरी बाळगा - पोलिसांचे आवाहन 

पुणे (रफिक शेख) : सध्या लॉकडाउनच्या काळात सोशल माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. फेसबूक, व्हाट्सअप वरून संवादही मोठ्या प्रमाणात साधले जात आहेत. मात्र या माध्यमांचा वापर करताना सावधगिरी बाळगा अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. असा इशारा सायबर सेलच्या वतीने देण्यात आला आहे. नुकतेच पुण्यामध्ये सायबर सेलकडे येत असलेल्या तक्रारीवरून मोठ्या प्रमाणात तरुणांना आणि व्यापाऱ्यांना अक्षरशः लुबाडले गेल्याचे प्रकरण समोर येत आहेत. सुरुवातीला तरूणींच्या आकर्षक फोटो आणि नाव वापरून बनावट प्रोफाइल च्या माध्यमातून मैत्रीसाठी फेसबुकवर आग्रह केला जातो. सुंदर सुंदर मेसेज आणि सुंदर फोटो पाहून युवकांना भुरळ पडते. सुरुवातीला सकारात्मक, सामाजिक संदेशाची देवाण-घेवाण करतच नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक मोबाईल वरून स्त्री आवाजात अत्यंत लडिवाळपणे प्रेमाचा संवाद साधला जातो. प्रेमळ बोलल्याने अनेक तरुण भाळतात. आपल्याशी बोलणारी व्यक्ती ही एखादी सुंदरी आहे असे समजून तिच्यासोबत सुरुवातीला प्रेमळ आणि नंतर अश्लील चॅटिंग केली जाते. हे करत असताना समोरचा व्यक्ती कोण? याची शहानिशा ही केली जात नाही. परिणामतः अशा प्रकरणात अडकवून तरुणांना, व्यापाऱ्यांना अश्लील फोटो पाठवून त्यांचेही नग्न फोटो मागवले जातात. उत्साहाच्या भरात अनेक तरुण आपलेही नग्न फोटो पाठवतात आणि मग हे नग्न फोटो आणि अश्लील संवादाचे चॅटिंग याची स्वतंत्र प्रोफाईल बनवून त्या तरुणांना, व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार वाढलेले आहेत. या प्रकरणी राजस्थान येथून दोन भामट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या चार-पाच महिन्यांपासून शंभराहून अधिक तरुणांना अशा प्रकारातून फसवणूक झाली असावी, हे सर्व पीडित पुरुष 25 ते 55 वयोगटातील आहेत. राजस्थानमधील भामटे आपण मुलगी आहोत असे दाखवून साऊंड मॉड्यूलेटिंग सॉफ्टवेअर वापरून मुलीच्या आवाजात संवाद साधले जातात, आणि नंतर याच माहितीच्या आधारे ही सर्व प्रोफाइल समाज माध्यमावर टाकून बदनामी करण्याची धमकी दिली जाते. पैशाची मागणी केली जाते. सुरुवातीला अनेकांनी पैसे दिले. मात्र हळूहळू मागणी वाढत गेल्यामुळे हे पीडित पुणे पोलिसांच्या सायबर क्राइम ब्रांचकडे दाखल झाले. पुण्यातील तब्बल शंभराहून अधिक तक्रारी सायबर सेलच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत पथकाकडे आल्या आहेत. उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे आणि इंटरनेट प्रोटोकॉल ऍड्रेस तसेच बँक खात्याचा तपशील यावरून पोलिसांनी शोध घेतला असता, ते भामटे राजस्थान येथील असल्याचे स्पष्ट झाले. राजस्थान पोलिसांनी अशा गुन्हात दोघांना अटक केली असून याही गुन्ह्याची उकल होईल. अशी अपेक्षा पुणे पोलिसांना आहे. हे भामटे पोलिसांच्या हाती लागतील अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. हाके यांनी दिली आहे.

 गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून मराठवाड्यात गाजलेल्या पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके या प्रकरणाची निश्चित उकल करून आरोपींचा शोध लावतील. अशी खात्री पुणेकरांना आहे. मात्र चांगली मैत्री असल्याशिवाय समाज माध्यमावर संवाद साधू नये, असेही पोलिसांनी सांगितले आहे.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!