शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेना आक्रमक

शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेना आक्रमक

उदगीर (अॅड.एल. पी. उगिले) : सध्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा काळ असून पेरणीपूर्व मशागतीची पूर्ण झाल्या आहेत. आता बी- बियाणे आणि खत खरेदी करण्याचा काळ आहे. गेल्यावर्षी बोगस आणि बनावट सोयाबीन बियाणा मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर आले होते. तसेच महागाईने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. एका बाजूला शेतीमालाला भाव कमी तर त्यात व्यापारी वर्गाकडून शेतकऱ्यांची होणारी लूट, त्यामुळे शेतकरी गोंधळलेल्या अवस्थेत आहे.

 खताच्या किमती कमी केल्या असल्या तरी खताचा जो जुना साठा होता, तो साठा कमी किमतीमध्ये अर्थात जुन्या किमती मधेच विकला जावा. अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच खत आणि बियाण्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांची लूट झाल्यास व्यापाऱ्यांची गय करणार नाही. असा इशाराही शिवसेनेच्या वतीने दिला आहे. यासंदर्भात उदगीर उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी त्यांना स्वतंत्रपणे निवेदन देऊन आपल्या मागण्या नमूद केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने शेती अवजारे, बी बियाणे, कृषी सेवा केंद्र या सर्वांनी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साठा आणि त्यांचा भाव फलक दर्शनी ठिकाणी लावावा. भाव फलक स्पष्ट असावे तसेच प्रत्येक खत विक्रेत्यांनी जुना स्टॉप किती आहे? त्याचे आॅडिट करून घ्यावे. रोजच्या रोज खत, बियाणे विक्री आणि शिल्लक स्टॉक दर्शनी भागात लावावा. स्विप मशीनचा वापर करावा. शासनाच्या नियमाप्रमाणे खत विक्री केली जावी. जास्त दराने खत विक्री केल्यास व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाईल. कृषी सेवा केंद्र आणि शेतीविषयक साहित्याची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची लूट करू नये. अन्यथा त्यांना धडा शिकवला जाईल. असाही इशारा सदरील निवेदनात देण्यात आला आहे. सदरील निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, विधानसभा संघटक श्रीमंत सोनाळे, नवी मुंबईचे विभाग प्रमुख आकाश बिरादार, माजी शहरप्रमुख कैलास पाटील, ब्रह्मजी केंद्रे, शिक्षक सेनेचे जिल्हा सचिव सचिन साबणे, तालुका संघटक अरुण बिरादार, शहर संघटक सचिन बिरादार, महिला आघाडीच्या अरुणा लेंडाणे, उपतालुका प्रमुख रामदास काकडे, शहर प्रमुख विकी गवारे, विष्णू चींतलवार, अनिल मोरे, व्यंकट साबणे, अर्जुन आटोळकर इत्यादी मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!