लेखिका साहित्य संमेलनाची अहमदपूरकरांना मेजवानी संमेलन अध्यक्षपदी एड. उषा दराडे यांची निवड

0
लेखिका साहित्य संमेलनाची अहमदपूरकरांना मेजवानी संमेलन अध्यक्षपदी एड. उषा दराडे यांची निवड

लेखिका साहित्य संमेलनाची अहमदपूरकरांना मेजवानी संमेलन अध्यक्षपदी एड. उषा दराडे यांची निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : जानेवारी महिन्यात नवव्या लेखिका साहित्य संमेलनाची अहमदपूरकरांना चांगलीच मेजवानी मिळणार असून या साहित्य संमेलनात कथाकथन, परीसंवाद , निमंत्रित कवयित्रींचे कवी संमेलन होणार असून मराठवाड्यातील नामवंत लेखिका साहित्यिक यात सहभागी असल्यामुळे अहमदपूर परिसरातील साहित्य रसिकांना चांगलीच मेजवानी मिळणार आहे .यामुळे तालुका आणि परिसरात आनंदाची लहर आहे. 20 आणि 21 जानेवारीला होणाऱ्या या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बीड येथील सुप्रसिद्ध लेखिका आणि उषा दराडे यांची निवड झाली असून संमेलनाचे उद्घाटक म्हणून जळगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे या उपस्थित राहणार आहेत. कॉ श्रीनिवास काळे स्मृती प्रतिष्ठान व मसाप शाखा अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या नवव्या लेखिका साहित्य संमेलनाचे आयोजन येथील संत जनाबाई साहित्यनगरी संस्कृती सभागृहामध्ये होणार आहे.

साहित्याचा मोठा वारसा असलेल्या अहमदपूर तालुक्यात मराठी साहित्याची आवड व जाण असलेली रसिक मंडळी खूप मोठ्या प्रमाणात आहेत.
दोन दिवशीय या लेखिका साहित्य संमेलना च्या पहिल्या दिवशी 20 जानेवारी रोजी सकाळी ग्रंथ दिंडी निघणारा सोनशश आहे याची सुरुवात सुप्रसिद्ध लेखिका ललिता गादगे यांच्या हस्ते होणार आहे, तर सकाळी दहा वाजता उद्घघाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या मुख्यमंचावर लेखिका प्रतिभा शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

दुपारी बारा ते दोन या वेळात पहिल्या परिसंवादात मराठी कादंबरी आणि मराठवाड्यातील स्त्री कादंबरी लेखन या विषयावर परिसंवाद होणार असून त्याच्या अध्यक्षपदी सावित्रा चिताडे( परभणी) या आहेत तर सहभाग डॉ. जयदेवी पवार, संजीवनी नेरकर, द्रौपदी पंदीलवाड, दीपा बियाणी, आशिया चिस्ती ,शारदा देशमुख यांचा आहे. दुपारी दोन ते तीन या वेळात कथाकथन असून अध्यक्षपदी सरोजा देशपांडे( परभणी) या आहेत , सहभाग अनिता येलमटे, रत्नमाला मोहिते, पुष्पा दाभाडे, सुनीता गुंजाळ, अनुपमा बन, व डॉक्टर सत्यशीला यांचा आहे. सायंकाळच्या थंड वातावरणात निमंत्रितांचे कवी संमेलन होणार असून त्याच्या अध्यक्षपदी डॉ. उर्मिला चाकूरकर( पैठण) या आहेत तर संजीवनी तडेगावकर, शैलजा कारंडे ,वैशाली पाटील, विमल मुदाळे, गौरी देशमुख, चंद्रमुखी बोळेगावे, वर्षा माळी मीना तोवर, कल्याणीराणी देशमुख ,नीता मोरे ,तृप्ती अंधारे यांच्या सह जवळपास 50 नामांकित कवयित्रीचा सहभाग आहे.
दुसऱ्या दिवशी 21 जानेवारी रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत विद्यमान तंत्रज्ञान आणि माध्यमातील स्त्री प्रतिमा या विषयावर परिसंवाद होणार असून याच्या अध्यक्षपदी प्रा समिता जाधव ह्या आहेत तर सहभाग विद्या बयास, अनुजा डोईफोडे, शर्मिष्ठा भोसले ,रेखाताई हाके, शैलजा बरुरे, वैशाली कोटंबे यांचा राहणार आहे. या नवव्या लेखिका साहित्य संमेलनाच्या स्वागतअध्यक्षा म्हणून कार्य प्रतिष्ठानच्या ॲड ज्योती काळे ह्या आहेत .या नवव्या लेखिका साहित्य संमेलनामुळे अहमदपूर आणि परिसरातील साहित्य क्षेत्रात कमालीची उत्सुकता असून साहित्याची चांगलीच मेजवानी अहमदपूरकरांना मिळणार हे मात्र निश्चित आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!