अहमदपूरचा आठवडी बाजार भरला थोडगा रोडला

0
अहमदपूरचा आठवडी बाजार भरला थोडगा रोडला

अहमदपूरचा आठवडी बाजार भरला थोडगा रोडला

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील आठवडी भाजीपाला बाजार पूर्वी जिल्हा परिषद च्या मैदानावर भरत होता मात्र त्या ठिकाणी सिंथेटिक वॉकिंग ट्रॅक झाल्यामुळे तो बाजार अहमदपूर नांदेड हाय वे वरती भरू लागला होता. मात्र हायवे चा रस्ता व मोठी वाहने होणारी गर्दी यामुळे त्या ठिकाणी रहदारीचा त्रासही होऊ लागला व अपघाताची शक्यता सुद्धा होती. म्हणून लोकांच्या मागणीवरून अहमदपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी नुकतेच सांगितले होते की पुढील आठवणी बाजार थोडगा रोड येथील निजवंते नगर येथे भरवण्यात येईल.

त्यानुसार आज दिनांक पाच फेब्रुवारी रोजी तालुक्यातील भाजीपाला विक्रीत्यांनी थोडगा रोड अहमदपूर येथे आठवडी भाजीपाला बाजार भरवला. मात्र थोडका रोड येथे भाजीपाला भरवण्यास काही विक्रेते व व्यापाऱ्यांनी विरोधी केला तर काही विक्रेत्यांनी समर्थांनी केले . आठवडी बाजार थोडगा रोड येथे भरल्यामुळे त्या ठिकाणी चांगलीच गर्दी झाली होती. या बाजार भरण्याच्या बाबत नगरपरिषद अहमदपूरचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्याशी बोलले असता त्यांनी या भाजीपाला बाजार भरवण्याबद्दल सर्वांचे आक्षेप व सूचना मागवल्या जातील व त्यानुसार सर्वांकष विचार करून निर्णय घेण्यात येईल असे दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

थोडगा रोड येथे भाजीपाला आठवडी बाजार भरवण्याच्या या निर्णयाचे या रोडच्या काही व्यापाऱ्यांनी स्वागत केले आहे तर काही व्यापारी विरोधी करताना दिसले भाजीपाला विक्रेत्यांच्या प्रतिक्रिया घेतला व त्यांना विचारले असता काही विक्रेत्यांनी या ठिकाणी ग्राहक येत नसून आम्हाला आज जबरदस्ती सर्व भाजीपाला कमी किंमतीत विकावा लागत आहे असे सांगितले तर काही लोकांनी या ठिकाणी मोकळी जागा व सुटसुटीत पणा आहे असेही सांगितले त्यामुळे पुढील आठवडी बाजार कोठे भरणार हे सांगता येत नाही. याबाबतीत नगरपालिका प्रशासन व भाजीपाला विक्रेते यांच्यामध्ये चर्चा होऊनच पुढचा निर्णय होईल असे वाटत आहे

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!