कर्तव्यदक्ष सहायक गटविकास अधिकारी – वैजनाथराव सोपानराव कांबळे

0
कर्तव्यदक्ष सहायक गटविकास अधिकारी - वैजनाथराव सोपानराव कांबळे

कर्तव्यदक्ष सहायक गटविकास अधिकारी - वैजनाथराव सोपानराव कांबळे

देवणी (लक्ष्मण रणदिवे) : नौकरी म्हटले की पदोन्नती ,सेवानिवृती या आयुष्याच्या घटनाक्रमातून प्रत्येक कर्मचाऱ्यांना जावे लागते. अशी ३४ वर्षांची प्रदीर्घ सेवा करून ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी ते सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून श्री वैजनाथ सोपानराव कांबळे हे २९ फेब्रुवारी२०२४ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या केलेल्या कार्याचा थोडक्यात आढावा पुढील प्रमाणे आहे.
वैजनाथ कांबळे यांचा जन्म उदगीर तालुक्यातील हेर या गावी सर्वसामान्य गरीब कुटूंबात झाला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतांना सुद्धा शिक्षणाशिवाय मनुष्याच्या जीवनात प्रगती नाही, अतिशय कठीण परिस्थितीत शिक्षण घेऊन नोकरीसाठी प्रयत्न केले. वैजनाथ कांबळे यांच्या प्रयत्नाला यश आले. दि २२ ऑक्टोबर १९९० रोजी ठाणे जिल्ह्यात ग्रामसेवक पदावर जिल्हा परिषद कार्यालयात ते रुजू झाले. त्यांनी ठाणे जिल्ह्यातील ऐरोली ग्रामपंचायत कार्यलयात चार वर्षे चांगल्या प्रकारे सेवा बजावली. यांच्या कार्याची दखल घेऊन सन १९९४ मध्ये लातूर जिल्हा परिषदेत बदली झाली व उदगीर पंचायत समितीत मध्ये रुजू झाले. तेव्हा उदगीर, वाढवाणा,हाळी हंडरगुळी, निडेबन, जळकोट आणि किणी याल्लादेवी व उदगीर तालुक्यातील ४ ते ५ गावे हागणदारी मुक्त करण्यात आले. या सर्वाधिक मोठ्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून या सर्वाधिक मोठ्या ग्रामपंचायतिच्या माध्यमातून विविध योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम केले. या कार्याची दखल घेऊन २००८ते मे २०१३ पंचायत समिती शिरुर अनंतपाळ येथे रुजु झाले. डिगोळ,साकोळ, येरोळ येथे मुख्य कार्यकारी अधिकारी गेडाम व उपसंचालक पटवारी यांच्या सूचनेनुसार डिगोळ गाव दोन महिन्यामध्ये हागणदारी मुक्त करण्यात आले. २४.७.२०१३ रोजी चाकूर पंचायत समितीला त्यांची ग्राम विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती झाली. तेथे आय. आर. डि. पी. या पदावर कार्यरत राहिले. २०१८ ते ९.९.२०२१ते आजतागायत देवणी पंचायत समितीत सहाय्यक गटविकास अधिकारी या पदावर कार्यरत होते. वैजनाथ कांबळे यांना१९९७ साली आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कोरोना काळात बचत गटाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयेची मदत केली आहे, तर वृक्ष लागवड , विशेष कर वसुली, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास, शबरी आवास योजनेअंतर्गत लोकांना घरकुलाचा लाभ मिळवून देण्याचे काम कांबळे यांनी केले आहे. तसेच स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत घर तिथे शौचालय मंजूर करून ते पूर्ण करून घेण्याचे काम करून घेतले आहे. पंचायत समिती अंतर्गत होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडल्या आहेत, जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढावा, म्हणुन वेळोवेळी शाळेला भेटी देऊन त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम वैजनाथ कांबळे यांनी केले आहे. तर पंचायत समितीला येणाऱ्या शेष फांडातून विविध प्रकारच्या योजनेमार्फत शिवण यंत्र, पिठाची गिरणी, दिव्यंगासाठी साहित्याचे वाटप कांबळे यांनी केले आहे. कांबळे यांना वेळोवेळी वरिष्ठ अधिकारी श्याम पटवारी यांचे मार्गदर्शन मिळाले, त्यामुळे हे शक्य झाले हे सर्व कार्य नेत्रदीपक केल्यामुळे प्रशासनाने यांना पाच वेळा आगाऊ वेतनवाढ दिली आहे. ते २९ फेब्रुवारी २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचे पुढील आयुष्य सुखी समाधानी जावे हीच शुभेच्छा.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!