गोवंश हत्या बंदी कायद्याची कडक अमलबजावणी करा मनसे उदगीर

0
गोवंश हत्या बंदी कायद्याची कडक अमलबजावणी करा मनसे उदगीर

गोवंश हत्या बंदी कायद्याची कडक अमलबजावणी करा मनसे उदगीर

उदगीर (एल.पी.उगीले) : शासनाने गोवंश हत्या बंदी कायदा करून कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गोवंशाचे संरक्षण करण्याच्या हेतुने कायदा केला, पण त्या कायद्याची अमलबजावनी होताना दिसुन येत नाही. दि 7 जानेवारी रोजी असेच कत्तलखान्याकडे जाणारे वाहन मनसे कार्यकर्त्यांनी पकडुन शहर पोलिसांच्या हवाली केले, त्यावरुन गु.रं.नं.12/2024 कलम 5 अव महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 सुधारित 2015 सहकलम 11(1)(3) प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला. व 17 गोवंश जातीच्या बैलाची सुटका करून गोरक्षण संस्था,सोमनाथपुर यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यामुळे सदर प्रकरणाची रितसर चौकशी करून हाळी हांडरगुळी बाजारावर कडक नजर ठेवून अशा गोवंशाची कत्तलखान्याकडे रवानगी करणार्‍यां व्यापाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करून गोवंशाचे रक्षण करावे.अन्यथा मनसे या कायद्याच्या अंमलबजावणी साठी तीव्र पाऊले उचलेल, याची नोंद घ्यावी.अशा आशयाचे निवेदन जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. या वेळी,मनसे शहराध्यक्ष संतोष भाऊ भोपळे, तालुका सचिव सुनिल तोंडचिरकर,मनविसे शहर सचिव रोहित बोईनवाड, शहर उपाध्यक्ष अविनाश जाधव, शेतकरी सेना तालुका उपाध्यक्ष अजय भंडे,शाखा सचिव पंकज गायवाडे, विकास काळे,हनुमंत नागापुर्णे,अनिकेत सुर्यवंशी,परमेश्वर बांमपटले इत्यादी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!