पश्चिम बंगाल येथील संदेशखली भागातील महिलावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात अभाविपची निदर्शने

0
पश्चिम बंगाल येथील संदेशखली भागातील महिलावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात अभाविपची निदर्शने

पश्चिम बंगाल येथील संदेशखली भागातील महिलावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात अभाविपची निदर्शने

लातूर (एल.पी.उगीले) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद लातूर महानगराच्या वतीने पश्चिम बंगाल येथील संदेशखली भागातील महिलावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निदर्शने करून निषेध व्यक्त करणार आला.
10 फेब्रुवारी 2024 रोजी पश्चिम बंगालचे राज्यपाल आनंद बोस यांच्या संदेशखली भेटीमुळे या भीषण शोषणाचे सत्य व्यापक स्वरूपात जनतेसमोर आले. पश्चिम बंगालमध्ये, सत्ताधारी पक्षाचे नेते हिंदू घरातील अल्पवयीन मुली आणि महिलांना जबरदस्तीने,भीतीपोटी त्यांचे अपहरण करतात आणि त्यांना तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात आणतात, आणि अत्याचार करतात. असे अनेक घृणास्पद प्रकरणे उघडकीस आली आहेत.बहुतांश पीडित महिला अत्यंत मागासलेल्या आणि अनुसूचित जातीतील आहेत. आणि त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून अनेक कुटुंबांना संदेशखलीतून पळून जावे लागले आहे. पश्चिम बंगाल राज्याच्या महिला मुख्यमंत्र्यांच्या आश्रयाने वर्षानुवर्षे होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक शोषणाला कंटाळलेल्या संदेशखळी येथील हजारो महिला आज राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आश्रयाने राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून संदेशखलीतील महिलांचे शोषण होत असताना आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात राज्य पोलीस अपयशी ठरले आहेत; त्यामुळे या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी अभाविप संपूर्ण देशभर निदर्शने करून जिल्हाधिकऱ्यांमार्फत राष्ट्रपतीना निवेदन देण्यात येत आहे. राज्य सरकारचा सहभाग लक्षात घेऊन संपूर्ण संदेशखळी घटनेची उच्चस्तरीय चौकशी केंद्रीय यंत्रणांकडून करण्यात यावी, आणि तात्काळ कारवाई करण्यात यावी, संदेशखलीतील महिलांवरील अत्याचार आणि त्यांच्या सामूहिक अस्मितेचे उल्लंघन याला तत्काळ आळा घालण्यात यावा, महिलांवरील हिंसाचार आणि अत्याचाराच्या घटनांचे वास्तव सरकार, प्रशासन आणि न्यायिक संस्थांपर्यंत निर्भयपणे पोहोचवण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून द्यावा, न्यायाचा सोयीसाठी, पीडित महिलांना मोफत कायदेशीर मदत दिली जावी, या महिलांना मानसोपचार तज्ज्ञांद्वारे समुपदेशन सत्राची सुविधा देखील प्रदान केली जावी. जेणेकरुन अनेक वर्षांच्या मानसिक अत्याचारातून हळूहळू बरे वाटेल. अशी मागणी यावेळी करण्यात आले.
यावेळी महानगरमंत्री सुशांत एकोर्गे यांनी असे म्हणाले की “गेल्या अनेक वर्षांपासून पश्चिम बंगालमधील उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील संदेशखली भागातील महिलांचे लैंगिक शोषण केले जात आहे, त्यांच्या सामूहिक अस्मितेचे उल्लंघन केले जात आहे, आणि त्यांच्या कुटुंबीयांवर राज्याचे संरक्षण असलेल्या गुन्हेगारांकडून पद्धतशीरपणे अत्याचार केले जात आहेत, ममता सरकार या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा काम करत आहे.सरकार माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या संवेदनशिल घटनेने अभाविप दुखावले असून त्याचा तीव्र निषेध करते. अशी भावना यावेळी बोलताना व्यक्त केली.
यावेळी वैष्णवी शिंदे ,तेजुमई राऊत, अनुजा चामे ,प्रणव कोळी,अजय ठाकूर, केदार मोरगे, सुजित भोसले, पार्थ पिनाटे,नरेंदप्रतापसिंह ठाकूर, अवि गजभारे, योगेश कोलबुदे,बालाजी हट्ट,प्राप्ती बाबर,दिपाली कोडबले व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!