शिक्षणातून संस्कारांची पेरणी व्हावी – राजेसाहेब कदम

0
शिक्षणातून संस्कारांची पेरणी व्हावी - राजेसाहेब कदम

शिक्षणातून संस्कारांची पेरणी व्हावी - राजेसाहेब कदम

उदगीर (एल.पी.उगीले) : विद्यार्थी जीवनात पुस्तकी ज्ञानाबरोबर संस्कार महत्वपूर्ण असतात. जाती-धर्माच्या भिंती तोडून माणुसकीची इमारत उभारण्यासाठी बाह्य अलंकारापेक्षा संस्कार महत्त्वाची भूमिका पार पाडतात. त्यामुळे शिक्षणातून संस्कारांची पेरणी व्हावी, असे मत सुप्रसिद्ध कवी राजेसाहेब कदम यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलन उदयोत्सव 2024 च्या उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी हे होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव अ‍ॅड. एस. टी. पाटील व डॉ. आर. एन. लखोटिया, सदस्य बसवराज पाटील मलकापूरकर, शिवराज वल्लापुरे, प्रशांत पेन्सलवार, ललिता पाटील, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य प्रा. एस. जी. कोडचे, पर्यवेक्षक प्रा. जे. आर. कांदे, विद्यार्थी कल्याण मंडळ प्रभारी प्रा. डॉ. एस. एन. लांडगे, प्रा. डॉ. मल्लेश झुंगास्वामी, प्रा. डॉ. अर्चना मोरे, श्रीगण रेड्डी, परमेश्वर वाकुडे, विद्यार्थी प्रतिनिधी ओंकार स्वामी यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना राजेसाहेब कदम म्हणाले, कवीला मनाची भाषा कळते. कविता प्रश्न निर्माण करते, त्याचबरोबर कविता ठरवून लिहिता येत नाही. सामाजिक विसंगतीतून कविता जन्म घेते. प्रत्येक विद्यार्थ्याने कवितेचा आशय समजून घ्यावा व त्यातून नवनिर्मिती कशी करता येईल, यासाठी प्रयत्न करावा, असे मत मांडले. त्यांनी आपल्या विविध कवितांच्या सादरीकरणातून रसिकांना मंत्रमुग्ध केले. अध्यक्षीय समारोप करताना मल्लिकार्जुन मानकरी म्हणाले, संस्काराशिवाय माणसाची प्रगती, समृद्धी व विकास होऊ शकत नाही. वार्षिक स्नेहसंमेलनातून कला गुण प्रदर्शित करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत असते. त्यामुळे संस्कार करण्यासाठीच वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी तर पाहुण्यांचा परिचय स्नेहा नामवाड या विद्यार्थिनीने करून दिला. स्वागतगीत आरती वाकोडे या विद्यार्थिनीने गायले. सूत्रसंचालन शुभम मोतीपवळे व वैष्णवी आचार्य यांनी तर आभार हेमलता गायकवाड हिने मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!