लोककलेला प्रामाणिकपणे जोपासा – लोककलावंत प्रमिला लोदगेकर

0
लोककलेला प्रामाणिकपणे जोपासा - लोककलावंत प्रमिला लोदगेकर

लोककलेला प्रामाणिकपणे जोपासा - लोककलावंत प्रमिला लोदगेकर

उदगीर (एल.पी.उगीले): प्रतिकूल परिस्थितीवर मात करतच यशाचे शिखर गाठता येते. त्यामुळे गरिबी परिस्थितीविषयी नकारात्मकता बाळगण्यापेक्षा आपण कलेवर प्रेम केले पाहिजे. कला कोणतीही असो ती प्रामाणिकपणे जोपासा, असे मत उस्ताद बिस्मिल्ला खान राष्ट्रीय युवा पारितोषक विजेत्या लोककलावंत प्रमिला लोदगेकर यांनी व्यक्त केले. त्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन उदयोत्सव – 2024 च्या समारोप समारंभ व पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव रामचंद्र तिरुके हे होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, सहसचिव ॲड.एस.टी.पाटील, डॉ.आर.एन.लखोटिया, सदस्य बसवराज पाटील मलकापूरकर, शिवराज वल्लापुरे, मन्मथ बिरादार, प्रशांत पेन्सलवार, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष रमेशअण्णा अंबरखाने, महाविद्यालय विकास समिती सदस्य पंडित सूर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.के.मस्के, उपप्राचार्य एस.जी.कोडचे, प्रा.जे.आर.कांदे, प्रा.एस.व्ही.मुडपे, विद्यार्थी कल्याण मंडळ प्रभारी डॉ. सुरेश लांडगे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना लोदगेकर म्हणाल्या, आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उच्चविद्या विभूषित होण्याचे स्वप्न बाळगा. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यायाने सांस्कृतिक क्षेत्रामध्ये स्वतःचा एक वेगळा पॅटर्न निर्माण केला आहे. तो आपण सर्वांनी जोपासावा, असे आवाहन उपस्थितांना केले. उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले म्हणाले की, विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून वाटचाल करावी. आई-वडील व गुरुजनांना सार्थ अभिमान वाटेल असे कर्तृत्व साध्य करावे. सुप्रसिद्ध निवेदिका प्रा.शोभा कुलकर्णी म्हणाल्या, स्नेहसंमेलनातून कलाकार घडत असतात. मराठवाड्याची माती कर्तुत्वासाठी नेहमीच प्रेरक राहिली आहे, याचा सार्थ अभिमान आपल्या सर्वांना असावा. अध्यक्षीय समारोप करताना रामचंद्र तिरुके म्हणाले, समाजाने लावणीकडे, लोककलावंता कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा, प्रत्येक कला ही सांस्कृतिक कलात्मकतेमध्ये भरच टाकत असते. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय ठेवून आपले स्वप्न साकार करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत. असे आवाहन उपस्थितांना केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के. मस्के यांनी तर पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ. मल्लेश झुंगास्वामी यांनी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा नामवाड व सुष्मिता बोरगावकर यांनी तर आभार विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रभारी प्राध्यापक डॉ.सुरेश लांडगे यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!