आमदार बाबासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्याला यश !

0
आमदार बाबासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्याला यश !

आमदार बाबासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्याला यश !

अहमदपूर चाकूरच्या रस्ते कामांसाठी सुमारे ५०० कोटींचा निधी मंजूर..

अहमदपूर (गोविंद काळे) : हायब्रीड अन्यूटी अंतर्गत अहमदपूर चाकूर मतदारसंघातील रस्ते विकास कामांसाठी आ. बाबासाहेब पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा. अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती. यावर काल झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयात अहमदपूर तालुक्यातील सांगवी उजना हिप्परगा सुमठाना ढाळेगाव अंधोरी किनगाव कारेपूर रेणापूर रस्त्यासाठी २६१ कोटी ४ लक्ष ७० हजार ६२० तसेच चाकूर तालुक्यातील शेलगाव किनी ( यल्लादेवी) वाढोना घोणसी, गुट्टी अतनुर धर्माबाद ते राज्य सरहद्द रस्ता रामा रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करण्यासाठी एकूण २३० कोटी ५१ लक्ष २७ हजार २६९ रुपयांचा निधी मंजूर झाला असून आमदार बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. अहमदपूर चाकूर येथील दोन्ही रस्त्याच्या कामांसाठी सुमारे ५०० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री व राज्य शासनाचे बाबासाहेब पाटील यांनी आभार मानले आहेत.

आमदार बाबासाहेब पाटील यांच्या माध्यमातून गेल्या ४ वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून घेत अनेक रस्त्याची कामे झाली. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर दळणवळणाची व्यवस्था उत्तम असली पाहिजे या दृष्टीकोनातून आमदार बाबासाहेब पाटील यांनी रस्ते कामांवर भर दिला आहे. मतदारसंघात होत असलेल्या कामामुळे नागरिकांकडून देखील समाधान आणि आभार व्यक्त केले जात आहे.

कोट –
अहमदपूर चाकूर मधील कामांना मंजुरी दिल्याबद्दल राज्य शासनाचे आभार व्यक्त करतो. आपल्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत तर काही पूर्णत्वास जात आहेत. सर्वांगीण विकास साधायचा असेल तर दळणवळणाची सोय उत्तम असायला हवी याच दृष्टीकोनातून मी देखील रस्ते आणि पायाभूत सुविधांवर भर देत सर्वांगीण विकास साधत आहे. यापुढील काळात देखील मतदारसंघातील जनतेच्या साथीने आणि विश्वासाने नक्कीच विकास साधला जाईल.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!