सर्वसामान्य जनतेला सहज उपलब्ध होऊन,निस्वार्थ सेवा करणारे खा. सुधाकरराव श्रृगांरे हे जनतेच्या मनातील उमेदवार

0
सर्वसामान्य जनतेला सहज उपलब्ध होऊन,निस्वार्थ सेवा करणारे खा. सुधाकरराव श्रृगांरे हे जनतेच्या मनातील उमेदवार

अहमदपूर (गोविंद काळे) : गेल्या पाच वर्षांत खासदार सुधाकरराव श्रृगांरे यांनी सर्वसामान्य जनतेत समरस होऊन निस्वार्थपणे सर्व धर्मीय जनतेची सेवा केल्यामुळे या निवडणुकीत खा. सुधाकरराव श्रृगांरे यांचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी यांनी केले आहे. खा. सुधाकरराव श्रृगांरे यांनी लातूर जिल्ह्यात हरघर नल योजनेसाठी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी आणुन महीलाच्या डोक्या खांद्यावरील घागर उतरण्याचे कार्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून लातूर येथील महत्वकांक्षी असलेला पीट लाईटचा विषय मार्गी लावून रस्त्याचे जाळे निर्माण केले आहेत. खा. सुधाकरराव श्रृगांरे यांनी गेल्या पाच वर्षांत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, अण्णा भाऊ साठे अशा अनेक महापुरुषांच्या जयंती उत्सव स्वखर्चाने करून जनसामान्याचे मने जिंकली आहेत. गेल्या पाच वर्षांत कोट्यावधी रुपयांचा विकास निधी मतदारसंघात विनामोबदला वितरित केला असून खा. सुधाकरराव श्रृगांरे यांनी आजपर्यंत एक रुपयांची टक्केवारी घेतली नाही किंवा कुठलाच एक रुपयांच्या हप्त्याला स्पर्ष केला नसल्याने खा. सुधाकरराव श्रृगांरे यांना स्वच्छ प्रतिमेचा, निस्वार्थी, निष्कलंक, चारीत्रसंपन्न उमेदवार म्हणून ओळखले जात आहे. लातूर लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्ष व महायुतीचे व जनतेच्या मनातील लोकप्रिय उमेदवार खा. सुधाकरराव श्रृगांरे यांचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *