उदगीर सायकलिंग क्लब निघाले 35 सायकलस्वार निघाले अयोध्या, प्रयागराज, वाराणसीला

0
उदगीर सायकलिंग क्लब निघाले 35 सायकलस्वार निघाले अयोध्या, प्रयागराज, वाराणसीला

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर सायकलिंग क्लबच्या 35 उत्साही सायकलस्वांरानी मृदा संवर्धनाचा संदेश घेऊन उदगीरहून आयोध्या वाराणसी असा प्रवास महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या तीन राज्यातून जाणारा हा 1500 किलोमीटर अंतराचा प्रवास सायकलवर पूर्ण करणार आहेत.
या सायकल प्रवासाची सुरुवात उदगीर येथील दुधीया हनुमान येथून निघून श्रीराम मंदिर चे दर्शन घेऊन येथून सुरूवात होणार आहे. प्रवास करताना प्रत्येक शहरात रँलीच्या माध्यमातून उदगीर ते वारंगा फाटा, यवतमाळ, नागपूर, शिवनी, जबलपूर, मेहर, चाकघाट, प्रयागराज, आयोध्या, जैनापुर, वाराणसी असा 1500 कि.मी. किलोमीटर अंतराचा प्रवास 10 दिवसात पूर्ण करणार आहेत.
साईनाथ कोरे, सुनिल ममदापूरे यांच्या नेतृत्वाखाली सायकलस्वार 2002 सालापासून दरवर्षी उदगीर ते तिरुपती हे अंतर सायकलवर पूर्ण करणारी, ही उदगीर मधील विविध क्षेत्रात कार्यरत असणारी मंडळी, या त्यांच्या भक्तीपूर्ण सायकलस्वारीला दरवर्षी सामाजिक आणि पर्यावरण संदेशाची जोड देऊन, समाजाप्रती असलेले त्यांचे उत्तरदायित्व अशा आगळ्या वेगळ्या उपक्रमांतून सातत्यपूर्ण पणे निभावत आहेत.
उदगीर सायकलींग क्लब चे हे सायकलस्वार बुधवार, दिनांक 25 डिसेंबर 2024 ला त्यांच्या या मोहिमेस प्रारंभ करून दि. 03 जानेवारी 2025 रोजी ते श्रीराम मंदिर आयोध्या येथे पोहचणार आहे.

या वर्षी सुद्धा सायकल टीम कॉन्शियस प्लॅनेट Save Soil (माती वाचवा) उपक्रमासाठी काम करत आहे, जो ईशा फाऊंडेशनचा एक आउटरीच प्रकल्प आहे आणि मृदा संवर्धन आणि पुनरुज्जीवन याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी काम करत आहे. 2017 मध्ये रामेश्वरम-” रॅली फाॅर रिव्हर्स- नद्यांसाठी रॅली”, 2018 मध्ये महाबलीपुरम् -“ईशा विद्या”, आणि 2019-20 मध्ये कोइंम्बतूर-“कावेरी कॉलींग” 2021 मध्ये कन्याकुमारी “कॉन्शियस प्लॅनेट” Save Soil तसेच 2022 मध्ये जगन्नाथ पुरी “कॉन्शियस प्लॅनेट” Save Soil (माती वाचवा), 2023 मध्ये तिरुवनंतपुरम (केरळा) या ईशा फाउंडेशनच्या सोशल आउटरीच प्रकल्पांसाठी त्यांनी असाच सायकलींग द्वारे सहभाग नोंदवून लांबचा पल्ला गाठलेला असून. ईशा फाउंडेशन च्या उपक्रमात सहभागी व्हायचे हे त्यांचे सलग सातवे वर्ष आहे.
उत्साही सायकलस्वार हाफ आयर्न मॅन विजेते गोविंद रंगवाळ तसेच योगीराज बारोळे वय वर्षे 13 हा देखील या सायकल प्रवासात आहे.
सायकलींगचा एक वेगळा मापदंड निर्माण करणाऱ्या आणि उदगीरकरांची शान असणाऱ्या या टीम मध्ये साईनाथ कोरे, सुनील ममदापूरे, विनोदकुमार टवानी, भास्कर कुंडगीर, ज्ञानेश्वर चंडेगावे, अश्विन पांढरे, नागनाथ वारद, दीपक पाटील, कपिल वट्टमवार, नितीन जुल्फे, चंद्रकांत ममदापूरे, गोविंद रंगवाळ, मुकेश निरूने, रितेश तिवारी, कैलास वडजे, भीमाशंकर बहिरेवार, पांडुरंग पाटील, हरिप्रसाद दंडीमे, मुकुंद चव्हाण, विवेक बिरादार, प्रेमनाथ मोदी, महेंद्र मादलापुरे, कपिलदेव कल्पे, बिरादार सतीशकुमार, प्रमोद बुटले, मोरे संतोष, रामेश्वर तोंडारे, सचिन पंदीलवार तसेच सहकारी म्हणून गणेश गुंडरे, सुधीर जिरोबे, माधव हालकुडे, पंडित डोईफोडे हे सहभागी आहेत.
समाजातील विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!