आणखीन चार सराईत गुन्हेगार लातूर जिल्ह्यातून हद्दपार (तडीपार)

0
आणखीन चार सराईत गुन्हेगार लातूर जिल्ह्यातून हद्दपार (तडीपार)

लातूर (एल.पी.उगीले) कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी या उद्देशाने समाज विभाग कृत्य करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना हद्दपारची शिक्षा दिली जाते. आतापर्यंत अनेक सराईत गुन्हेगारांना हद्दपार केले आहे. आणखीन चार गुन्हेगारांना लातूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
याबाबत याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस ठाणे एमआयडीसी, तसेच लातूर जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत टोळी तयार करून सतत गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांविरुद्ध एक वर्षा करिता हद्दपारीची (तडीपार) कारवाई करण्यात आली आहे.हद्दपारची कारवाई करण्यात आलेल्याचे नावे
अभी उर्फ बसवेश्वर उरगुंडे (पाटील), (रा. रायवाडी ता. जि. लातूर),विशाल सुभाष उरगुंडे (पाटील) (रा. रायवाडी, ता. जि. लातूर),संजय भारत मुळे, (रा. रायवाडी ता. जि. लातूर),प्रसाद बब्रुवान पवार, (रा. नागझरी ता. जि. लातूर).असे असून नमूद आरोपींतावर पोलीस ठाणे एमआयडीसी हद्दीमध्ये समाजविघातक कारवाया करणे, परिसरातील रहिवासी लोकांच्या मालमत्तेला इजा पोहोचऊन ,भय निर्माण करणे, प्राणघातक शस्त्र वापरून दहशत निर्माण करणे, आजन्म कारावास किंवा अन्य करावासाचे शिक्षेस पात्र असलेले गुन्हे करणे, शांतता भंग करणे, यासारखे गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यामुळे सामाजिक शांतता धोक्यात आली होती.लातूर जिल्ह्यात शांतता अबाधित राहावी नमूद सराईत गुन्हेगारांकडून कोणत्याही प्रकारचे गैरकायदेशीर कृत्य घडू नये, याकरिता लातूर शहरात वारंवार मालमत्ता विषयी व शरीराविषयी गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून सामाजिक शांतता करणाऱ्या गुन्हेगाराना 1 वर्षासाठी लातूर जिल्ह्यातून हद्दपार (तडीपार) करण्यात आले आहे. नमूद गुन्हेगारांना लातूर जिल्ह्याच्या हद्दीच्या बाहेर सोडण्यात येत आहे.
नमूद आरोपी विरुद्ध उपविभागीय पोलीस अधिकारी, (लातूर शहर) रणजीत सावंत, पोलीस ठाणे एमआयडीसी चे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन द्रोणाचार्य, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलीस अमलदार प्रदीप स्वामी, पोलीस ठाणे एमआयडीसी चे पोलीस अंमलदार गणेश माळवदे व डि. बि. पथकाचे पोलीस अमलदार यांनी सविस्तर हद्दपार प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्याकडे पाठविले होते. त्यावर पोलीस अधीक्षकांनी सदर प्रस्तावांचे अवलोकन करून नमूद आरोपीमुळे सामाजिक शांततेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 प्रमाणे कार्यवाही करून सदर सराईत गुन्हेगारांना लातूर जिल्ह्यातून हद्दपार (तडीपार) केले आहे.
गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या सराईत गुन्हेगार, उपद्रवी लोकांवर जरब बसवण्यासाठी या आधी अनेक गुन्हेगाराना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!