श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याच्या मिरवणुकीत संभाजी ब्रिगेड कडून फळे आणि पाणी वाटप

0
श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याच्या मिरवणुकीत संभाजी ब्रिगेड कडून फळे आणि पाणी वाटप

उदगीर (एल.पी.उगीले) श्री राम जन्मोत्सव सोहळ्याच्या मिरवणुकीत संभाजी ब्रिगेडने केले फळे आणि पाणी वाटप. प्रत्येक वेळी महामानवाची जयंती असो किंवा मिरवणूक सोहळा अथवा उत्सव कार्यक्रम असो, संभाजी ब्रिगेडने वेगवेगळा कार्यक्रम राबवलेला आहे. शिव भोजन, खिचडी वाटप, फळे वाटप, पाणी वाटप, गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे, गरिबांना लग्न साहित्य घेऊन देणे, रुग्णांना फळ वाटप, असे प्रत्येक वेळी वेगवेगळे कार्यक्रम राबवून समाजापुढे एक आदर्श निर्माण केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा घेऊन चालत आलेला आहे. गोरगरिबांच्या आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावर संभाजी ब्रिगेडने आवाज उचलला असून सर्व स्तरातून संभाजी ब्रिगेडचे कौतुक होत आहे. श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यात फळे आणि पाणी वाटप करताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री राजकुमार माने, विधानसभा अध्यक्ष शिवश्री उत्तमजी फड, जिल्हा सचिव शिवश्री मोहनेश्वर विश्वकर्मा, कार्याध्यक्ष शिवश्री बाळासाहेब चिंचोलकर, जिल्हा संघटक महबूब सय्यद, जिल्हा सहसचिव व्यंकट थोरे, उदगीर तालुका अध्यक्ष शिवश्री राजकुमार भालेराव, कार्याध्यक्ष नरसिंग बनशेळकेकर ,तालुका सचिव सावंत तोरणेकर, तालुका सहसचिव दीपक गायकवाड, मनोहर हिंडे, संतोष पांढरे, श्रीराम प्रतिष्ठान चे अध्यक्ष शिवश्री सतीश राजेंद्र पाटील,छावा संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दत्ता पाटील,बिपिन पाटील,सामाजिक कार्यकर्ते शंकर मोरे,डॉ.आचवले ,कृष्णा गिरी, राहुल आतनुरे,सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब सूर्यवंशी,अंकुश ताटंपल्ले, राम रावणगावे, दिगंबर माने, अभिजीत पाटील, सचिन बिरादार, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!