सात कलमी कृती कार्यक्रमाची लातूर पोलिसांकडून प्रभावी अमलबजावणी

0
सात कलमी कृती कार्यक्रमाची लातूर पोलिसांकडून प्रभावी अमलबजावणी

लातूर (एल.पी.उगीले)पोलिस ठाणे व कार्यालयांमधील 69155 अभिलेख निंदणीकरण करुन, आवश्यक नसलेली 62647 अभिलेख नष्ट तर एकूण 40465अभिलेखांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचा 100 दिवसांचा सात कलमी कार्यक्रम राज्यभर राबवण्यात येत असून,त्या अनुषंगाने लातूर पोलिस दलात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमांमध्ये लातूर पोलीस दलात अद्यावत वेबसाईट, सुकर जीवनमान, स्वच्छता, तक्रार निवारण, कार्यालयीन सोयीसुविधा, आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन, पोलिस ठाण्याना, कार्यालये भेटी, इत्यादी विषयावर बारकाईने कामकाज चालू असून लातूर जिल्हा पोलिस दलाने पोलिस प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करताना वेबसाईट अद्ययावत करून नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सुकर जीवनमान अंतर्गत सायबर सुरक्षित, स्वच्छता मोहीम, तक्रार निवारण दिन, ई ऑफिस कार्यप्रणाली, महिला व बालकांच्या तक्रार निवारण व रक्षणासाठी एक खिडकी योजना, असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. सात कलमी कार्यक्रमांतर्गत लातूर जिल्हा पोलिस दलाने वेबसाईटच्या माध्यमातून नागरिकांना सेवा उपलब्ध होईल यादृष्टीने वेबसाईट “Interactive” करण्यात आले असून “Data Security” बाबत आवश्यक दक्षता घेत, संकेतस्थळ अद्ययावत ठेवतानाच संकेतस्थळाच्या सुरक्षेबाबत राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे सर्व माहिती अद्ययावत करून, लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 मधील तरतूदींनुसार सर्व सेवांबाबतची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे याकरीता सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.
पोलिस ठाणे व कार्यालयांमधील 69155 अभिलेख निंदणीकरण करुन आवश्यक नसलेली 62647 अभिलेख नष्ट तर एकूण 40465 अभिलेखांचे वर्गीकरण करण्यात आले आहे . एकुण पोलीस ठाणे व कार्यालयांमधील जुन्या व निरुपयोगी जडवस्तूंची (उदा. संगणक, टेबल, खुर्च्या, कपाटे, इत्यादी) विहित कार्यपद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कार्यालयांच्या, पोलीस ठाण्याच्या आवारात असणारी जुनी व वापरात नसलेली वाहने यांचे विहित पद्धतीने निर्लेखन करण्यात येत आहे.
नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींचे त्वरेने निराकरण करण्यात येत आहे. प्रलंबितता शून्य करण्या बाबत सूचना करण्यात आले असून सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी कार्यालयात, पोलीस ठाण्यात येणाऱ्या अभ्यागतांच्या भेटीसाठी आठवड्यातील दैनंदिन वेळ राखून ठेवून तसे फलक कार्यालयामध्ये दर्शनी भागात लावण्यात आले आहेत.
पोलीस ठाण्याचे वातावरण प्रसन्न व आल्हाददायक राहील, याकरिता विशेष प्रयत्न करून कार्यालयाचे व परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे.
व्यापारी वर्गाच्या संघटनांशी चर्चा करुन त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करून गुंतवणूकदार उद्योजकांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण तसेच कायदा व सुव्यवस्था या बाबींची प्रभावीपणे हाताळणी करण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणे प्रभारी अधिकारी, कार्यालयप्रमुख, कर्मचारी यांनी या सप्तसूत्रीची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!