मतदारांच्या ऋणातून कधीच उतराई होऊ शकणार नाही – आ. रमेशआप्पा कराड

लातूर (एल.पी.उगीले)
विधानसभेची निवडणूक रमेश कराड यांनी लढवली नाही तर गोरगरीब, सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी हातात घेऊन लढवली, मतदारांनी प्रचंड आशीर्वाद दिले, नवा इतिहास घडवला. हे कदापी विसरू शकत नाही, मी माझे संपूर्ण आयुष्य खर्ची घातले तरी मतदारांच्या या ऋणातून, उपकारातून कधीच उतराई होऊ शकत नाही. असे प्रतिपादन लातूर ग्रामीण मतदार संघातील नवनिर्वाचित आ. रमेश आप्पा कराड यांनी केले.लातूर ग्रामीण विधानसभा निवडणुकीत मतदारानी एकाधिकारशाही, हुकूमशाही आणि धनशक्ती विरुद्ध आवाज उठून भाजपा महायुतीचा ऐतिहासिक विजय केल्याच्या निमित्ताने मतदारांशी संवाद साधून जाहीर आभार व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत आ. रमेशआप्पा कराड बोलत होते. याप्रसंगी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख ऍड. बळवंतराव जाधव, युवा नेते ऋषिकेशदादा कराड, भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, प्रदीप पाटील खंडापूरकर, ओबीसी मोर्चाचे भागवत सोट,पंचायत राज सेल जिल्हा संयोजक नवनाथ भोसले, हनुमंतबापू नागटिळक, बन्सी भिसे, वैभव सापसोड, सुरज शिंदे, साहेबराव मुळे, विजय काळे, प्रताप पाटील, सतीश आंबेकर, वसंत करमूडे, भैरवनाथ पिसाळ, शामसुंदर वाघमारे, विश्वास कावळे, काशिनाथ ढगे, राजकुमार सुरवसे, बालाजी दुटाळ यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेस चिंचोली आणि परिसरातील गावागावातून मोठ्या उत्साहाने कार्यकर्त्यांसह मतदार बंधू भगिनी उपस्थित होते.
चिंचोली गावात निवडणूक काळात येऊ शकलो नाही, तरीही आकराशेहून अधिक मताधिक्य मिळाले. हा मतदारांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास होता. असे सांगून यावेळी बोलताना आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, मतदार संघातील गावागावात, वाडी – वस्तीत कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करून, मेहनतीने, जिद्दीने निवडणूक जिंकली. निवडणुकीत पैशाचा पाऊस पडला, मतदारांचे इमान विकत घेण्याचा प्रयत्न झाला. माझे कार्यकर्ते गोरगरीब, अल्पभूधारक असून कसल्याही आमिषाला बळी पडले नाहीत. उलट त्यांनाच त्यांची जागा दाखवून जमिनीवर आणले. हा माझा अभिमान आहे.
विधान परिषदेच्या आमदारकीचा उपयोग ग्रामीण भागातील गावा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गोरगरीब सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी केला. तीन – साडेतीन वर्षात मतदारसंघात तब्बल तेराशे कोटी रुपयांची कामे मंजूर केली. लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाच्या विकासाचा नवीन पॅटर्न निर्माण करण्याचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन करून सर्वच विकास कामे एका दिवसात होणार नाहीत. निश्चित पणे प्रत्येक गावच्या सर्वांगीण विकास कामांना टप्प्याटप्प्याने निधी दिल्या शिवाय राहणार नाही असे आ. कराड यांनी बोलून दाखविले.
तांत्रिक अडचणीमुळे मांजरा, रेणा, विकास साखर कारखान्याच्या निवडणुका आपण सक्षमपणे लढू शकत नव्हतो, यामुळे माघार घेतली असे सांगून आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, सहकारी साखर कारखाने हे देशमुखाच्या नव्हे तर शेतकऱ्यांच्या मालकीचे आहेत. जोपर्यंत या कारखान्याचे शेतकरी मालक होणार नाहीत, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. या पुढील काळात शेतकऱ्यांची आडवणूक आणि पिळवणूक करण्याचा प्रयत्न झाला तर त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. रस्त्याने फिरू देणार नाही. असा इशारा आ. कराड यांनी यावेळी बोलताना दिला. लोकसभा निवडणुकीत एका डोळ्याची शस्त्रक्रिया झाली होती, मात्र आठव्या दिवशी घराबाहेर पडल्याने विधानसभा निवडणुकी नंतर परत डोळ्याचा त्रास झाल्याने पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागली. काँग्रेसवाल्यांनी अनेक उलट सुलट चर्चा केली, अफवा सोडल्या कदाचित ते शुभचिंतक असतील असे सांगून त्याकडे दुर्लक्ष करा, कामावर निष्ठा ठेवा, जनता जनार्धन हेच परमेश्वर आहे. जोपर्यंत गोरगरीब जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत काहीही होणार नाही असेही त्यांनी बोलून दाखविले.
लातूरची जनता क्रांतिकारी आहे. रमेशआप्पा निवडून आले आणि देशमुखाचे पाय जमिनीला लागले. मतदार बंधू भगिनींनी आपल्यावर विश्वास टाकला, त्या विश्वासाला पात्र राहून काम करण्याची जबाबदारी आता कार्यकर्त्याची असल्याचे सांगून यावेळी बोलताना बळवंतराव जाधव म्हणाले की, येणाऱ्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत आपले कार्यकर्ते सत्तेत सहभागी झाले पाहिजेत. यासाठी सर्वांनी मेहनत करण्याची गरज आहे. शेतकऱ्याचा सन्मान वाढविण्यासाठी यापुढील काळात काम करण्याची आवश्यकता त्यांनी बोलून दाखविली. युवा नेते ऋषिकेशदादा कराड यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघातील नवा इतिहास घडला, माझ्या कातडीची जोडे करून मतदारांच्या पायात घातले तरी त्यांनी कराड परिवारावर दाखवलेल्या विश्वासाचे, उपकाराचे पांग फिटणार नाहीत. यापुढील काळात सर्वांना सोबत घेऊन सर्वांच्या मनातील विकासाच्या संकल्पना पूर्ण करण्यासाठी काम करू या, असे बोलून दाखवले.
या सभेत विक्रमकाका शिंदे, भागवत सोट, हनुमंतबापू नागटिळक, साहेबराव मुळे, सुरज शिंदे, राजकुमार सुरवसे, योगीराज साखरे, राम गोरे यांच्यासह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी बप्पासाहेब कावळे यांनी सभेचे प्रास्ताविक केले तर शेवटी ईश्वर बुलबुले यांनी उपस्थित आमचे आभार मानले. सभेचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले.
यावेळी भाजपा व मित्र पक्षाचे गोविंद नरहरे, शरद दरेकर, बाबा भिसे, विनायक मगर, गोपाळ पाटील, विजयकुमार मलवाडे, पांडुरंग बालवाड, रशीद पठाण, आदिनाथ मुळे, धनराज शिंदे, बालासाहेब कदम, चंद्रकांत वांगस्कर, ज्ञानेश्वर जुगल, पांडुरंग गडदे, सदाशिव गव्हाणे, सुधाकर काळे, विश्वनाथ शिंदे, सचिन देशमुख, दत्ता सप्ताळ, मारुती शिंदे, पद्माकर होळकर, नानासाहेब भिसे, रमेश सुरवसे, अशोक गंणगे, धनंजय जाधव, रमेश लहाडे, सचिन लटपटे, रुपेश काळे, सचिन सवई, बालाजी नाईकवाडे, प्रशांत शिंदे, वैजनाथ लवटे, बालाजी कावळे, अण्णा भडंगे, श्रीकांत देशमाने, रंगनाथ नवले, किशोर कुलकर्णी, गोविंद नांदे, सुनील कावळे यांच्यासह चिंचोली आणि परिसरातील विविध गावचे भाजपा व मित्र पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी कार्यकर्ते मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.