महात्मा बसवेश्वरांनी समाजात समतेचा विचार रुजविला – आ. संजय बनसोडे

0
महात्मा बसवेश्वरांनी समाजात समतेचा विचार रुजविला - आ. संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले): महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात जातिव्यवस्थे बरोबर अंधश्रद्धा इतर वाईट गोष्टींविरुद्ध संघर्ष केला.स्त्री – पुरुष समानता , उच्च-नीच भेदभाव नष्ट करण्यासाठी लढा उभारला. अनुभव मंटपाच्या माध्यमातून पहिल्या लोकसंसदेची बिजे रोवली. समाजात समतेचा विचार रुजविला म्हणून जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन आपण सर्वांनी जीवनाची वाटचाल करावी, असे मत माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर शहरातील नगर परिषदे समोरील प्रांगणात जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त बसव ध्वजारोहण व अभिवादन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी माजी आ.मनोहर पटवारी, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, माजी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, उषा कांबळे, जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रमोद शेटकार, बाजार समितीच्या सभापती प्रीती भोसले, माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, सुभाष धनुरे, प्रा.मल्लेश झुंगास्वामी, बाबुराव पांढरे, भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा उत्तरा कलबुर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद जानी मियाँ, वसंत पाटील, शशिकांत बनसोडे, अनिल मुदाळे, भाजपाचे माजी शहराध्यक्ष मनोज पुदाले, भाजपा शहराध्यक्ष अमोल अनकल्ले, माजी नगरसेवक गणेश गायकवाड, सुभाष धनुरे, उध्दव महाराज हैबतपुरे, कुणाल बागबंदे, अॅड. महेश मळगे, साईनाथ चिमेगावे, अमोल निडवदे, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, नवनाथ गायकवाड, मधुमती कनशेट्टे, उर्मिला वाघमारे, अनिता बिरादार, शांतवीर मुळे, समीर शेख, कुणाल बागबंदे, मंदाकिनी जिवणे, हुस्ना बानो, अनिता बिरादार, शशिकला पाटील, बालाजी गवारे, पप्पु गायकवाड, शफी हाशमी, प्रदीप जोंधळे, व्यंकट बोईनवाड, नरसिंग शिंदे, श्रीकांत पाटील, रुपेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे जात, सामाजिक स्थिती या गोष्टींचा विचार न करता सर्व लोकांना समान संधी देत जिवनात परिवर्तन घडुन आणले .अनुभव मंटपात सर्व जातीधर्मातील शरण सहभागी होते. त्याचे वचन साहित्याच्याच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम केले. काम हेच ईश्वर मानुन श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली.
मागील काळात जळकोट येथे जगतज्योती म.बसवेश्वरांचा पुर्णाकृती पुतळा उभारला, उदगीर व जळकोट येथे लिंगायत भवनची निर्मिती केली. भविष्यात ही समाजातील सर्व प्रश्न सोडवणार असुन येत्या काळात समाजाच्या मागणीचा विचार करुन बसव भवन उभारणार असल्याचेही आ.बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व समाजातील प्रतिष्ठित नागरीक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!