उदगीरच्या समाजवादी विचाराची जनता काँग्रेसच्या पाठीशी राहणार – डॉ. अंजुम कादरी

0
उदगीरच्या समाजवादी विचाराची जनता काँग्रेसच्या पाठीशी राहणार - डॉ. अंजुम कादरी

उदगीर (प्रतिनिधी)
उदगीर शहरातील जनता जातीपातीच्या राजकारणाला वैतागलेली आहे. जात पात विरहित आणि सर्वधर्मसमभावाचा विचार घेऊन चालणाऱ्या सर्व मतदारांचा कौल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोबत आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रचाराची गती विचारात घेऊन विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. चक्क महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उदगीर शहरात येऊन त्यांच्या परीने काही आश्वासन देण्याचा प्रयत्नही करून गेले, मात्र उदगीरची सर्वसामान्य जनता अशा भोंगळ आदर्शवादाला आणि नेहमीच्याच घोषणांना बळी पडणार नाही. कारण 2016 मध्ये ह्याच मुख्यमंत्र्यांनी उदगीर जिल्हा करण्याच्या बेंबीच्या देठापासून वल्गना केल्या होत्या. मात्र इतके दिवस गेले, प्रत्यक्ष कारवाई काही झालेली नाही. याही पलीकडे जाऊन उदगीर परिसरातील सुशिक्षित बेकार, बेरोजगार यांचे प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत. रोजगार निर्माण करणाऱ्या उद्योगधंद्यांना गती यावी, म्हणून तत्कालीन आमदार स्व. चंद्रशेखर भोसले यांनी प्रयत्न करून एमआयडीसीला मंजुरी मिळवली होती. मात्र त्यानंतर एमआयडीसीचे घोंगडे भिजत पडले आहे. गेले कित्येक वर्षापासून केवळ एमआयडीसीच्या गप्पा मारल्या जातात. प्रत्यक्षात सर्वसामान्य माणसाच्या विकासाचा कोणीही विचार करत नाही. सर्वसामान्य माणसाच्या भल्याचा विचार फक्त आणि फक्त काँग्रेस पक्ष करू शकतो. त्यामुळेच काँग्रेस पक्षासोबत जनता आहे. असे विचार काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अंजुम कादरी यांनी व्यक्त केले आहेत.
1970 च्या काळाच्या दरम्यान अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहिलेल्या ॲड. अब्दुल्ला कादरी यांना उदगीरकरांनी त्यांची वैचारिक प्रगल्भता लक्षात घेऊन नगराध्यक्ष बनवले होते. जनतेतून निवडून आलेले ते पहिले नगराध्यक्ष असल्यामुळे त्यांनी आपल्या कार्यकाळात कधीही जातीयवाद, धर्मवाद आणला नाही. भ्रष्टाचार मुक्त, पारदर्शक राजकारण काय असू शकते? हे त्यांनी दाखवून दिले. तो आदर्श आपल्या रक्तात भिंनेलेला आहे. त्यामुळे जनता माझ्या पाठीशी आहे.
काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता नगर परिषदेसमोरील मैदानात राज्याचे युवा नेते तथा काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना चैतन्य निर्माण करणारे व्यक्तिमत्व आमदार अमितभैया विलासराव देशमुख यांची भव्य जाहीर सभा होणार आहे.
उदगीर परिसरातील जनता ही समाजवादी विचारधारेला मानणारी आहे. त्यामुळे तो विचार जिवंत ठेवण्याची जबाबदारी योगायोगाने काँग्रेस पक्षाने माझ्यावर सोपवली आहे, आणि उदगीर परिसरातील जनतेचा विश्वास सार्थ करून उदगीरचा विकास ज्या पद्धतीने माझ्या वडिलांनी घडवून आणला. तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून भ्रष्टाचार मुक्त प्रशासन काय असते? हे मी दाखवून देऊ शकते. असा विश्वासही याप्रसंगी डॉ. अंजुम कादरी यांनी बोलून दाखवला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!